शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सातपुड्यातील ८५ गावांचा काळोख मिटता मिटेना! १०० टक्के विद्युतीकरणाचा दावा करणाऱ्या राज्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:27 IST

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता.

रमाकांत पाटील -

नंदुरबार : राज्यातील १०० टक्के गावांचे विद्युतीकरण झाल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी जिल्ह्यातील ८५ गावे मात्र अद्यापही काळोखातच आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ही गावे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांच्या विद्युतीकरणासाठी १८० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी निधीचा प्रश्न अजून सुटलेला नाही.

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ९३० गावे आणि दोन हजार ९९१ पाड्यांपैकी ८४५ गावे आणि दोन हजार २३ पाड्यांचे विद्युतीकरण झाल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले.

उर्वरित ८५ गावे व ९६८ पाड्यांसाठी विद्युतीकरण करण्याचा आराखडाही यावेळी तयार करण्यात आला. त्यात एक गाव आणि २३३ पाडे विविध योजनांतून विद्युतीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आले, तर ८४ गावे आणि ७३५ पाडे हे वीज कंपनीने राज्य शासनाच्या निधीतून करण्यासाठी प्रस्तावित केले. त्याकरिता १८० कोटी ६२ लाख रुपये खर्चाचा आराखडाही तयार केला. परंतु गेल्या पाच वर्षांपासून हा आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आज हा खर्च जवळपास २५० कोटींवर पोहोचला आहे. मात्र, त्यासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात तरी या गावांना प्रकाश पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :electricityवीजState Governmentराज्य सरकार