शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सातपुड्यातील ८५ गावांचा काळोख मिटता मिटेना! १०० टक्के विद्युतीकरणाचा दावा करणाऱ्या राज्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:27 IST

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता.

रमाकांत पाटील -

नंदुरबार : राज्यातील १०० टक्के गावांचे विद्युतीकरण झाल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी जिल्ह्यातील ८५ गावे मात्र अद्यापही काळोखातच आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ही गावे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांच्या विद्युतीकरणासाठी १८० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी निधीचा प्रश्न अजून सुटलेला नाही.

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ९३० गावे आणि दोन हजार ९९१ पाड्यांपैकी ८४५ गावे आणि दोन हजार २३ पाड्यांचे विद्युतीकरण झाल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले.

उर्वरित ८५ गावे व ९६८ पाड्यांसाठी विद्युतीकरण करण्याचा आराखडाही यावेळी तयार करण्यात आला. त्यात एक गाव आणि २३३ पाडे विविध योजनांतून विद्युतीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आले, तर ८४ गावे आणि ७३५ पाडे हे वीज कंपनीने राज्य शासनाच्या निधीतून करण्यासाठी प्रस्तावित केले. त्याकरिता १८० कोटी ६२ लाख रुपये खर्चाचा आराखडाही तयार केला. परंतु गेल्या पाच वर्षांपासून हा आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आज हा खर्च जवळपास २५० कोटींवर पोहोचला आहे. मात्र, त्यासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात तरी या गावांना प्रकाश पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :electricityवीजState Governmentराज्य सरकार