शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील ८५ गावांचा काळोख मिटता मिटेना! १०० टक्के विद्युतीकरणाचा दावा करणाऱ्या राज्यातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 17:27 IST

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता.

रमाकांत पाटील -

नंदुरबार : राज्यातील १०० टक्के गावांचे विद्युतीकरण झाल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी जिल्ह्यातील ८५ गावे मात्र अद्यापही काळोखातच आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ही गावे अजूनही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. या गावांच्या विद्युतीकरणासाठी १८० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असला तरी निधीचा प्रश्न अजून सुटलेला नाही.

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ९३० गावे आणि दोन हजार ९९१ पाड्यांपैकी ८४५ गावे आणि दोन हजार २३ पाड्यांचे विद्युतीकरण झाल्याचे वीज वितरण कंपनीने जाहीर केले.

उर्वरित ८५ गावे व ९६८ पाड्यांसाठी विद्युतीकरण करण्याचा आराखडाही यावेळी तयार करण्यात आला. त्यात एक गाव आणि २३३ पाडे विविध योजनांतून विद्युतीकरणासाठी प्रस्तावित करण्यात आले, तर ८४ गावे आणि ७३५ पाडे हे वीज कंपनीने राज्य शासनाच्या निधीतून करण्यासाठी प्रस्तावित केले. त्याकरिता १८० कोटी ६२ लाख रुपये खर्चाचा आराखडाही तयार केला. परंतु गेल्या पाच वर्षांपासून हा आराखडादेखील कागदावरच राहिला आहे. आज हा खर्च जवळपास २५० कोटींवर पोहोचला आहे. मात्र, त्यासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरू नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात तरी या गावांना प्रकाश पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :electricityवीजState Governmentराज्य सरकार