शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

दहा हजार शेतकरी पीक विम्याच्या परताव्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी तीन लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होते. कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात पीकपेरा होताे. ...

जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी तीन लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होते. कोरड आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रात पीकपेरा होताे. गेल्या दशकभरात हवामान बदलाचा परिणाम झाल्याने कोरडा आणि ओला दुष्काळ अशा दोन्ही संकटांना शेतकरी सामोरे गेले होते. दरम्यान, या संकटातून मार्ग काढता यावा यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजना अमलात आणली होती. ही विमा योजना लागू करण्यात आल्यानंतर सात वर्षांत संपूर्ण नुकसान होऊनही केवळ दोनच वेळा पूर्ण क्षमतेने नुकसानभरपाई मिळाली आहे. यातून ही योजना शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा लूट करण्यासाठीच असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना पीककर्ज देणाऱ्या बँका विमा योजना ऐच्छिक असतानाही शेतक-यांना विमा करण्याची सक्ती करत आहेत. परंतु, भरपाई देताना मात्र संबंधित कंपन्यांकडून त्याची भरपाई देताना विलंब होत आहे.

२०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील १५ हजार ९०५ शेतकरी पीक विम्यात सहभागी झाले होते. या शेतकऱ्यांनी ३१ कोटी ७२ लाख ७९ हजार २२३ रुपयांचा भरणा केला होता. २०१९ च्या हंगामात कापसावर आलेला रोग घातक ठरला होता. दरम्यान, पावसाळ्यात सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. पीक कापणी प्रयोगातून मात्र केवळ ६ हजार ३९७ शेतकऱ्यांनाच भरपाई देण्यात आली. २ हजार ३४७ हेक्टर क्षेत्राला ४७ कोटी २४ लाख ५१ हजार ७६ हजार रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली होती. परंतु, उर्वरित ९ हजार शेतकरी मात्र भरपाईपासून वंचित राहिले.

दरम्यान, २०२०-२१ च्या खरीप हंगामात १० हजार ६२१ शेतकऱ्यांनी १८ कोटी ८६ लाख ८ हजार ६६४ रुपयांचा भरणा करत पिकांचा विमा केला होता. यातून केवळ ४६३ शेतकऱ्यांना १ काेटी ९५ लाख ८० हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.