शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बलदाणे धरणातील पाणीसाठ्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

कारवाईच्या भीतीने पुन्हा होतेय धावपळ नंदुरबार : शहरातील विविध भागांत वाहनांच्या तपासणीला गती देण्यात येत आहे. याअंतर्गत दुचाकी व ...

कारवाईच्या भीतीने पुन्हा होतेय धावपळ

नंदुरबार : शहरातील विविध भागांत वाहनांच्या तपासणीला गती देण्यात येत आहे. याअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन वाहनचालक कारवाईच्या भीतीने पोलिसांना पाहून पळापळ करत असल्याचे प्रकार सुरू आहेत.

करण चाैफुलीवरचे खड्डे बुजवले

नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर गेल्या वर्षी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने या भागात रस्ता नूतनीकरण करण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरात पुन्हा खड्डे पडले होते. हे खड्डे पुन्हा बुजवण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडे नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने खड्डे बुजवले आहेत.

समस्या कायम

नंदुरबार : तालुक्यातील तापी काठालगतच्या गावांमध्ये शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून शेतकरी हैराण झाले आहेत. कंपनीने या गावांसाठी चांगल्या दर्जाचे ट्रान्सफाॅर्मर देण्याची मागणी आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही.

साइडपट्टी द्यावी

नंदुरबार : सेंधवा ते विसरवाडी या महामार्गावर नंदुरबार ते प्रकाशादरम्यान लहान शहादे गावात रस्ता काम पूर्ण झाले आहे. यात आरोग्य केंद्रासमोर एका बाजूला मातीचा भराव नसल्याने अपघातांची शक्यता आहे. या ठिकाणी मातीचा भराव करून देण्याची गरज असतानाही महामार्ग विभागाचे दुर्लक्ष आहे.

दुर्गम भागात आमचूरच्या हंगामाची तयारी

धडगाव : गेल्या वर्षात कोरोनामुळे मागे पडलेला आमचूरचा हंगाम यंदा मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी आदिवासी बांधवांकडून तयारी सुरू झाली असून होळीनंतर आमचूर तयार करण्याच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. आमचूर खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून संपर्क करण्यात आल्याची माहिती असून त्यानुसार झाडावरील कैऱ्यांची तोडणी करून कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.

कृत्रिम टंचाई

नंदुरबार : जिल्ह्यात वीज कंपनीकडून थकबाकीदार ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा कनेक्शन कट करण्यात येत आहे. यातून जिल्ह्यात कृत्रिम पाणीटंचाईचे संकट वाढत आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाने याकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

द्राक्षांची आवक

नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतून द्राक्षांची आवक वाढली आहे. काळी व हिरवी द्राक्षे सध्या खवय्यांची पसंती ठरत आहेत. या द्राक्षांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्याने बाजारपेठेत द्राक्षांची जोरदार खरेदी-विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.