शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्केच खतांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा होणार आहे़ गत आठवड्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा होणार आहे़ गत आठवड्यात पावसाने हजेरी दिल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे़ यासाठी लागणारे बियाणे आणि खते यांची मागणी आहे़ यात बियाणे मुबलक स्वरुपात उपलब्ध असले तरी जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत केवळ ५० टक्के खत साठा उपलब्ध असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात १ लाख १८ हजार १६० मे. टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने केली होती़ यातून कृषी संचालनालयाने ९८ हजार ९३० मेट्रीक टन खत साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे़ मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून २५ हजार ५२७ मेट्रीक टन एवढे रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध होते़ उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी तसेच मिश्र खतांची आवक करण्यावर भर देण्यात आल्याने खत टंचाई टळणार असल्याचे बोलले जात होते़ दरम्यान गेल्या काही दिवसात लॉकडाऊनमुळे जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या खत रॅकला विलंब होत होता़ यातून जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा मर्यादित झाला आहे़ यातच कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांना शेतकऱ्यांना युरीयासोबत मिश्र खत देण्याच्याही सूचना केल्या असल्याने अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ परंतू मिश्र खते ही शेतीसाठी उपयुक्त असल्याने ती शेतकºयांनी युरियासोबत वापरुन पिकांना नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस द्यावा अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे़ यातून जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे़दरम्यान काहीअंशी असलेली ही टंचाई ३० जूनपर्यंत प्राप्त होणाºया रॅकमधून संपणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७० हजार २६० मेट्रीक टन युरिया, ७ हजार ८५० मेट्रीक टन डीएपी, ७ हजार ८४० मेट्रीक टन एमओपी, ११ हजार ५०० मेट्रीक टन एसएसपी तर २० हजार ७१० मेट्रीक टन मिश्र खतांची मागणी केली होती़ यातून जिल्ह्यात ४७ हजार ३०० मेट्रीक टन यूरीया, ५ हजार २०० डीएपी, ९ हजार ८०० एमओपी, १७ हजार १५० एसएसपी तर १९ हजार ४८० मेट्रीक टन मिश्र खते मंजूर करण्यात आली आहेत़४मंजूर केल्यापैकी जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ हजार २१ मेट्रीक टन युरिया उपलब्ध आहे़ २ हजार ५१४ मेट्रीक टन डीएपी, १ हजार ८१९ मेट्रीक टन एमओपी, १३ हजार ९७ मेट्रीक टन एसएसपी तर १२ हजार ७९३ मेट्रीक टन मिश्र खते उपलब्ध आहेत़जिल्ह्यात मागणी केलेल्या १ लाख १८ हजार मेट्रीक टन खतापैकी ९८ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाल्यानंतर ते तातडीने प्राप्त होण्याची अपेक्षा होती़ परंतू याउलट स्थिती सध्या जिल्ह्यात असून आजअखेरीस केवळ ३३ हजार ५१० मेट्रीक टन खताचा प्रत्यक्षात पुरवठा करण्यात आला आहे़ यातही मागणील १७ हजार ८४५ मेट्रीक टन खत साठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात आजअखेरीस केवळ ५१ हजार ३५५ मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत़कृषी विभागाने म्हटल्यानुसार येत्या आठवड्यात खतांचे रॅक प्राप्त होणार आहे़ टंचाईत वाढ होवू नये यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकºयांनी लागेल तेवढेच खत खरेदी करण्याचे सूचित केले आहे़जिल्ह्यात शेतकºयांसाठी खत उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ केवळ युरियाची खरेदी न करता शेतकºयांनी मिश्र खते खरेदी केली पाहिजेत़ यात प्रामुख्याने नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस यांचा अंतर्भाव असलेल्या पिकांवर भर दिला पाहिजे़ योग्य त्या पद्धतीने विभागाकडून खतांचे वितरण सुरु आहे़ सर्व विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत़ भरारी पथकांना सूचना केल्या आहेत़-प्रदीप लाटे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबाऱखरीप हंगामात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी होणे प्रस्तावित आहे़ सर्वाधिक १ लाख २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाचे नियोजन आहे़ यासाठी कृषी विभागाने ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदवली होती, यापैकी ३१ हजार ६७ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ विभागाने २६ हजार क्विंटल बियाणे मागणी केली होती़ यापैकी १ हजार ८७८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आहे़ महाबीज आणि खाजगी कंपन्यांनी जिल्ह्यात बियाण्यांचा पुरवठा केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे़