शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

अक्कलकुवा, खापर व मांडवी क्वॉरंटाईन केंद्रात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या पाच दिवसात मंदावली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या पाच दिवसात मंदावली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील क्वॉरंटाईन केंद्रांमधील संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पावणेदोनशे एवढ्या जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारपर्यंत १५१ जण जिल्ह्यात क्वॉरंटाईन होते. यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताणही कमी होत आहे. शहादा व नंदुरबारची केंद्रे मात्र फुल्ल आहेत.जिल्ह्यात प्रत्येक तालुका मुख्यालयाला व इतर असे १२ क्वॉरंटाईन केंद्र करण्यात आले आहे. त्यात महिला व पुरुषांसाठी वेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या व मध्यंतरीच्या काळात क्वॉरंटाईन सेंटरमधील लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. गेल्या काही दिवसात मात्र तक्रारी कमालीच्या कमी झाल्या आहेत. सद्य स्थितीत नंदुरबार, शहादा येथील केंद्रात अधीक तर धडगाव व अक्कलकुवा केंद्रात एकही जण क्वॉरंटार्इं नसल्याची स्थिती आहे. तळोदा व नवापूर केंद्रातील संख्या मात्र वाढली आहे.जिल्ह्यात नंदुरबारात सर्वाधिक पाच क्वॉरंटाईन केंद्र आहे. त्यात विमल हौसींग सोसायटीनजीक आदिवासी मुलांचे वसतिगृह व मुलींचे वसतिगृह, समाज कल्याण विभाग मुलींचे वसतिगृह, पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे वसतिगृह आणि हॉटेल गौरव पॅलेस यांचा समावेश आहे.शहादा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह, मोहिदारोड, शहादा. नवापूर येथे आदिवासी सेवा सहायक शिक्षण प्रसारक संस्थेचे वसतिगृह व जयहिंद छात्रालय. तळोदा येथे आदिवासी मुलांचे वसतिगृह- आमलाड, अक्कलकुवा येथे जवाहर नवोदय विद्यालय इमारत, खापर येथे आदिवासी मुलींचे वसतिगृह तर धडगाव येथे शासकीय आश्रम शाळा, मांडवी बुद्रूक यांचा समावेश आहे.लक्षणे कमी असल्यास...कोरोना संसर्गीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येते. अशा लोकांमध्ये कमी लक्षणे असल्यास किंवा त्यांना त्रास असल्यास त्यांचे स्वॅब घेतले जातात. ज्यांना काहीही त्रास नाही अशांची आरोग्य तपासणी केली जाते, आवश्यक वाटल्यास स्वॅब घेतला जातो. आठ ते १२ दिवस अशा लोकांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेऊन त्यांना घरी सोडण्यात येते. त्यामुळे आता क्वॉरंटाईन सेंटरमधील संख्या कमी होऊ लागली आहे. पूर्वी सलग १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे आवश्यक राहत होते.तक्रारींची संख्या कमीक्वॉरंटाईन सेंटरमधील तक्रारींचे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे. पूर्वी आरोग्य तपासणी न होणे, स्वॅब घेतले न जाणे, कचरा आणि अस्वच्छता, पाण्याची समस्या असे प्रश्न राहत होते. त्याच प्रकारच्या सर्वाधिक तक्रारी देखील राहत होत्या.ही बाब लक्षात घेता वरिष्ठ पातळीवरून स्थानिक प्रशासनांना कडक आदेश देण्यात आल्याने आता तक्रारींची संख्या अगदीच नगण्य झाली आहे. अर्थात ज्या ठिकाणी जास्त क्वॉरंटाईन आहेत अशा ठिकाणी काही कुरबूरी सुरूच असल्याचे चित्र आहे.गेल्या दोन दिवसात क्वॉरंटाईन सेंटरमधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये केवळ दोन जणांचा समावेश आहे.

नंदुरबारात आणखी दोन खाजगी लॉजेसला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यात आली आहे. यात आदर्श लॉज व श्रीजी रेसीडेन्सी यांचा समावेश करण्यात आला आहे.शहाद्यात देखील खाजगी लॉज किंवा हॉटेलला क्वॉरंटाईन केंद्राची मान्यता देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत.शहाद्यातील कोविड कक्ष सुरू करण्यात आल्याने नंदुरबारातील दोन्ही कक्षावरील ताण बऱ्यापैकी कमी होणार असल्याचे चित्र आहे.