शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची मनमानी थांबवा, भटके-विमुक्त हक्क परिषद अध्यक्ष श्याम राजपूत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

यासंदर्भात राजेंद्र राजपूत यांनी महासंचालक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय पुणे येथे निवेदन दिले आहे. यात २४ नोव्हेंबर २०१७ ...

यासंदर्भात राजेंद्र राजपूत यांनी महासंचालक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय पुणे येथे निवेदन दिले आहे. यात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जदाराच्या संबंधित नात्यांमध्ये वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरून इतर कोणताही पुरावा न मागता तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर अनुक्रमे ४५ दिवस व तीन महिन्यांच्या आत किंवा विशिष्टप्रकरणी पाच महिन्यांच्या आत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या विहित मुदतीत देण्याचे बंधनकारक केले आहे. तरी पडताळणी समित्यांकडून विनाकारण विलंब केला जातो आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सहज व वेळेवर मिळावे यासाठी जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची निर्मिती करण्यात येऊन त्यांना अर्धन्यायिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करणे बंधनकारक असतानादेखील सदर समित्या मात्र कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता प्रकरणे गैर हेतूने त्रटीशिवाय किंवा ऐनवेळी थातूरमातूर त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवत आहेत.

नियम १८ (५) अन्वये कोणतेही प्रकरण तीन महिन्यांच्या आत किंवा विशिष्टप्रकरणी पाच महिन्यांच्या आत निकाली काढण्याच्या नियमांची धुळे, जळगाव समित्यांकडून शासनाचा अंकुश नसल्यामुळे सर्रासपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे. याविषयी पडताळणी समित्यांची शिखर संस्था अर्थात महासंचालक बार्टी कार्यालय पुणे यांच्याकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. २९ सप्टेंबर २०२० रोजी या संदर्भात राज्यमंत्र्यांनी वेबिनारद्वारे आढावा बैठक घेऊन एक महिन्याच्या आत प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देऊन ही या महत्त्वपूणे बाबीची दखल घेतली गेली नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे सद्य:स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्रुटीच्या नावाखाली जाणून बुजून प्रकरणे प्रलंबित ठेवण्याऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. जात वैधता प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येऊ नये. तसेच सख्या नातेसंबंधात समान न्याय तत्त्वाला हरताळ फासून मनमानी कारभार करणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची चौकशी होऊन याकामी पारदर्शकता आणावी. या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून, सदर निवेदनावर भटक्या विमुक्त परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत व सचिव जालंधर भोई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.