शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यात सामान्यांसह दारिद्र्यात जगणाऱ्यांनाही झळ बसत आहे. ही महागाई नेमकी कशामुळे, ...

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यात सामान्यांसह दारिद्र्यात जगणाऱ्यांनाही झळ बसत आहे. ही महागाई नेमकी कशामुळे, असा प्रश्न खालपासून वरपर्यंतच्या वर्गाकडून विचारला जात आहे. यातून वस्तू त्याला व्हॅट, जीएसटी, सेल्स टॅक्स अशी उत्तरे समोर येत असून, सामान्यजनांच्या खिशाला लागणारी ही कात्री त्यांना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास अडचणीची ठरत आहे.

सन २०१७ - २०१८च्या जिल्हा आर्थिक समालोचनानुसार नंदुरबार जिल्ह्यात एकूण कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या ४ हजारांच्या घरात आहे. यात व्यापाऱ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात एक कोटीपेक्षा अधिक कर भरणा करणारे केवळ ९ जण असून, १० लाख ते १ कोटीपर्यंत कर भरणाऱ्यांची संख्या ८००च्या घरात आहे. यातून कोट्यवधी रुपयांचा टॅक्स वसूलही होतो. परंतु जिल्ह्यात किरकोळ वस्तूपासून मोठ्या वस्तूंपर्यंत टॅक्स देणारे हजारो नागरिक आहेत. दैनंदिन खरेदी - विक्रीच्या व्यवहारातून त्यांच्याकडून टॅक्स दिला जातो. यामुळे गरीब असो वा श्रीमंत त्याच्या खिशातून सरकार आपसूकच वस्तू विक्रीच्या माध्यमातून कर वसूल करत आहे.

सिक्युरिटी गार्ड : शहरातील विविध भागातील एटीएम, बँका, शासकीय कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून अनेक जण तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या वेतनात त्यांचेही भागेनासे झाले आहे.

साफसफाई कामगार : नियमित स्वच्छता करणारे सफाई कामगारही महागाईमुळे त्रस्त आहेत. वेतन कमी असल्याने अनेक बाबीत कपात करुन त्यांचे काम भागत आहे.

सलून चालक : सलूनचालकांचे लाॅकडाऊनमुळे सर्वाधिक हाल झाले. यातून व्यवसाय सुरु करुन दैनंदिन व्यवहार सुरु असला तरी टॅक्स भरण्याएवढी रक्कम त्यांच्याकडेही नाही.

लॉन्ड्री चालक : सर्वच जण कपड्यांना इस्त्री करतात असे नाही. जे करतात त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशांतून आमचा उदरनिर्वाह चालतो.

घर कामगार करणाऱ्या महिला : घरोघरी जाऊन घरगुती काम करीत असल्या तरी सर्वच ठिकाणी त्यांना काम मिळतेच असे नाही.

तीन चाकी रिक्षा चालक : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांमुळे भाडेवाढ करावी लागली आहे. यातून प्रवासी स्वत:ची वाहने वापरत असल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे.

चालक : रिक्षाचे भाडे मिळणे मुश्किल झाले आहे. दिवसभरात पेट्रोलचा खर्चही निघत नाही.

भाजीपाला विक्रेता : बाजार समितीतून भाजीपाला आणून त्याची विक्री करणे अडचणीचे ठरत आहे. खर्च वाढले आहेत. दर वाढवले तर ग्राहक येत नाहीत.

खाद्य पदार्थ विक्रेते : शहरातील विविध भागात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दरवाढ केल्यानंतर ग्राहकांवर परिणाम झाला.

बाजाराचे गमक हे क्रय आणि विक्रय या दोन शब्दात आहे. एखाद्या माणसाची क्रय शक्ती अर्थात कमाई चांगली असल्यास तो काहीही खरेदी करु शकतो. त्याला महागाईची कोणतीही चिंता नाही. परंतु ज्याची कमावण्याची शक्ती अत्यंत क्षीण आहे. त्याला फटका बसणारच, ही स्थिती सगळीकडेच आहे. यातून सावरण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या खर्चावर बंधने ठेवल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतील.

-प्राचार्य डाॅ. डी. एस. पाटील, अर्थतज्ज्ञ