मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता मतदान केले पाहिजे. कोणत्याही जात, धर्म, वंश, समाज, भाषा याच्या प्रभावाखाली न येता मतदान केले पाहिजे, असे मत शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. नवमतदारांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले आणि वक्तृत्त्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर मतदानाचे किती महत्त्व हे आपण जाणतो. एका मताला किती किंमत आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यादृष्टीने मतदान करणे हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. मतदार दिनाचा कार्यक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर दहा वर्षांपासून घेत आहोत. शहरातील कार्यक्रमाबरोबर तालुक्यातील जेवढी मतदान केंद्र आहेत, त्या ३३६ मतदान केंद्रांवर कार्यक्रम सुरू आहे. याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले.
सिद्धेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती कलाल यांनी सूत्रसंचालन केले. आशिष ठाकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात बटेसिंग गिरासे, सुनील बोरसे, नंदकिशोर सोनवणे, दीपमाला वळवी, अमोल जाधव, राजेंद्र बोरसे, कमलेश पाटील, असिफ अहमद हमीद सिकलकर, सिद्धेश्वर शिंदे, नरेश प्रजापत, शरदचंद्र पाटील, भरत सोनार आदींचा गाैरव करण्यात आला.