वारीता ही भय । कोण धरी धाक ।। भीती हा एक प्रकारचा मूर्खपणा आहे, जरी एखाद्याला साथीच्या रोगाने मरण न मिळालं तरी, एक दिवस मरणार आहे आणि तो एक दिवस हाही असू शकतो, म्हणून विद्वानप्रमाणे जगा, अज्ञानी मुर्खांच्या गर्दीत जगू नका !! " भीती घालविण्यासाठी संतांनी पर्याय सांगितला, सदा नामघोष करू हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ।। सर्वसुख ल्यालो सर्व अलंकार ।। आनंद निर्भय डुल्लतसो ।।
आपण या भीती निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग करावा. लोकांमधील भीती निर्माण करून एक मोठं अर्थकारण या विश्वात चालू आहे त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे भीती, भय निर्माण करणं चालू आहे. त्यासाठी भीती निर्माण करणाऱ्या आजूबाजुला ज्या ज्या घटना घडत आहेत त्यावर दुर्लक्ष करा. ज्यामुळे भीती निर्माण होईल ते वाचन बंद करा स्वतःला एकांतात न्या आणि अंतर्मुख होऊन आनंदाने निर्भय व्हाल अशा आत्मिक शक्तीचा शोध घ्या. योगा, प्राणायाम, व्यायाम करा आत्मबल वाढविणारे आत्मिक ऊर्जा देणारे सकारात्मक भाव निर्माण करणारे भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान, गाणे, ऐका पहा. तुम्ही ज्या विचार धारेला धरून चालतात त्यातील सकारात्मक गोष्टींचे अध्ययन करा आपली मानसिक स्थिती एकांतात नेऊन जगातील चाललेल्या राजकारण, द्वेष, विषमता, कपटी बाजारीकरणाचा त्याग करा. बगा विश्वासाने सांगतो मनातील भीती पूर्ण पणे नष्ट होईल आणि तुम्ही आनंदी समाधानी सुखी व्हाल. एकांतकाचे सुख देई मज देवा ।आघात या जिवा चुकवोनी ।। या पुढे मी सांगितलेले नियम पाळा नक्कीच तुम्हाला या महामारीतून भीतीमुक्त व्हाल समाधान वाटेल.