शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी विशेष मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असणाºया आणि अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी असणाºया आणि अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली असून आहे.केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक लाख आठ हजार ५५८ शेतकरी लाभार्थी आहेत. वेगवेगळया वित्तीय संस्था व बँकाकडून ७९ हजार ३८७ लाभार्थीं शेतकºयांना पिक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. कोणत्याही वित्त संस्था किंवा बँकांकडून पीक कर्ज न घेतलेल्या शेतकºयांची संख्या २९ हजार १७१ एवढी आहे. या शेतकºयांना बँकिंग क्षेत्रापासून पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील तसेच कृषी अधिकाºयांशी चर्चा करून ही विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या योजनेसाठी शेतकºयांना अर्ज करता यावा यासाठी आयबीए संस्थेकडून एक पानी अर्जाचा नमुना सर्व बँकांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. लाभार्थी शेतकºयांनी या अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणापत्र घेऊन ज्या बँकेमधून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतला आहे तेथे संपर्क साधावा.कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्था येथे पीक कर्ज नसणाºया प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकºयांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह प्राप्त झाल्यापासून १४ दिवसांमध्ये शेतकºयांना बँकामार्फत किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक गावपातळीवर बँकांना सहकार्य करतील. बँकांनीही शेतकºयांना सर्वतोपरी साहाय्य करावे. सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर यासाठी विशेष मोहीम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देशी जिल्हाधिकाºयांनी दिले.कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज न घेतलेल्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. या शेतकºयांची संख्या देखील कमी आहे. असे असतांनाही त्यांच्याबाबत दुजाभाव केला जात होता. आताच्या निर्णयामुळे मात्र जिल्ह्यातील जवळपास २९ हजार शेतकºयांचा त्याचा लाभ मिळणार असून त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे करणे आवश्यक ठरणार आहे.