शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मदरशामध्ये अडकले देशभरातील सहा हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा हजार २०० विद्यार्थी लॉकडाऊनमुळे येथील मदरशात अडकून पडले आहेत. लॉकडाऊन कधी संपते याकडे संस्थेचे लक्ष लागले असून या मुलांना आपापल्या घरी कसे पोहोचवता येईल यासाठी तालुका व जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.शहरातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसह शैक्षणिक संकुलातील सुमारे १२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संकुलातील विविध शैक्षणिक शाखांमध्ये पदवी तसेच पदवीकांचे शिक्षण घेणारी मुले संस्थेच्या वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेतात. मदरशाच्या मुख्य इमारतीत मौलाना, कारी, हापिज अशा विविध धर्मगुरूंच्या पदव्या मिळवण्यासाठी सुमारे १० हजारापेक्षा जास्त मुले संपूर्ण देशभरातील विविध राज्यांतून याठिकाणी धार्मिक शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे या मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारी सुमारे सहा हजार २०० मुले अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांची मदरशातील मुख्य इमारतीमध्ये सद्यस्थितीत व्यवस्था केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशात जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर लगेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्या देऊन आपापल्या घरी पाठवण्याचे आदेश दिले होते. या वेळी या मदरशातील शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा, महाविद्यालय, पदवी, पदविकाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या घरी पाठविण्यात आले होते. मात्र मदरशातील धार्मिक शिक्षण घेणाºया या मुलांना त्याचवेळी का पाठवण्यात आले नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. या विद्यार्थ्यांना त्याचवेळी आपापल्या घरी पाठवून दिले असते तर आज या विद्यार्थ्यांना मदरशात अडकून पडण्याची वेळ आली नसती याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यापूर्वी या मदरशातील हजारो विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले. याठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनाही पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्याच रात्री गृहसचिवांचे सक्त आदेश आल्यामुळे पोलीस प्रशासनाने या बसेसची परवानगी नाकारल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.या मदरशामधील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक जण सतत अरब देशांच्या तसेच इतर देशांच्या दौºयावर असतात. मात्र कोरोनानंतर येथील एकही जण परदेशातून न आल्याचे मदरशा प्रशासनाने केलेल्या दाव्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. मात्र काहीजण अरब देशातून प्रवास करून आल्याची शासकीय गुप्तहेर यंत्रणांना माहिती मिळाली होती त्यात सत्यता नव्हती का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.या मदरशात सालाबादाप्रमाणे होणारा जलसा अर्थात धर्मगुरू पदवीदान समारंभ एप्रिल महिन्याच्या अखेरीस होत असतो, त्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले नाही ना? याबाबतही चर्चा सुरू आहे.४मदरशात अडकून पडलेले विद्यार्थी कोणकोणत्या राज्यातील किती आहेत यासंदर्भात मदरसा प्रशासन, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क करूनही त्याबाबत आकडेवारी मिळू शकली नाही.