शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

मदरशामध्ये अडकले देशभरातील सहा हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारे महाराष्ट्रासह इतर राज्यातील सहा हजार २०० विद्यार्थी लॉकडाऊनमुळे येथील मदरशात अडकून पडले आहेत. लॉकडाऊन कधी संपते याकडे संस्थेचे लक्ष लागले असून या मुलांना आपापल्या घरी कसे पोहोचवता येईल यासाठी तालुका व जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.शहरातील जामिया इस्लामिया इशातुल उलूम अर्थात मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांसह शैक्षणिक संकुलातील सुमारे १२ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संकुलातील विविध शैक्षणिक शाखांमध्ये पदवी तसेच पदवीकांचे शिक्षण घेणारी मुले संस्थेच्या वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेतात. मदरशाच्या मुख्य इमारतीत मौलाना, कारी, हापिज अशा विविध धर्मगुरूंच्या पदव्या मिळवण्यासाठी सुमारे १० हजारापेक्षा जास्त मुले संपूर्ण देशभरातील विविध राज्यांतून याठिकाणी धार्मिक शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे या मदरशातील धार्मिक शिक्षण घेणारी सुमारे सहा हजार २०० मुले अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांची मदरशातील मुख्य इमारतीमध्ये सद्यस्थितीत व्यवस्था केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण देशात जनता कर्फ्यूच्या आवाहनानंतर लगेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय व खाजगी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्या देऊन आपापल्या घरी पाठवण्याचे आदेश दिले होते. या वेळी या मदरशातील शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा, महाविद्यालय, पदवी, पदविकाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या घरी पाठविण्यात आले होते. मात्र मदरशातील धार्मिक शिक्षण घेणाºया या मुलांना त्याचवेळी का पाठवण्यात आले नाही? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. या विद्यार्थ्यांना त्याचवेळी आपापल्या घरी पाठवून दिले असते तर आज या विद्यार्थ्यांना मदरशात अडकून पडण्याची वेळ आली नसती याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यापूर्वी या मदरशातील हजारो विद्यार्थी आपापल्या घरी पोहोचले. याठिकाणी अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनाही पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्याच रात्री गृहसचिवांचे सक्त आदेश आल्यामुळे पोलीस प्रशासनाने या बसेसची परवानगी नाकारल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.या मदरशामधील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक जण सतत अरब देशांच्या तसेच इतर देशांच्या दौºयावर असतात. मात्र कोरोनानंतर येथील एकही जण परदेशातून न आल्याचे मदरशा प्रशासनाने केलेल्या दाव्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. मात्र काहीजण अरब देशातून प्रवास करून आल्याची शासकीय गुप्तहेर यंत्रणांना माहिती मिळाली होती त्यात सत्यता नव्हती का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.या मदरशात सालाबादाप्रमाणे होणारा जलसा अर्थात धर्मगुरू पदवीदान समारंभ एप्रिल महिन्याच्या अखेरीस होत असतो, त्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले नाही ना? याबाबतही चर्चा सुरू आहे.४मदरशात अडकून पडलेले विद्यार्थी कोणकोणत्या राज्यातील किती आहेत यासंदर्भात मदरसा प्रशासन, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क करूनही त्याबाबत आकडेवारी मिळू शकली नाही.