शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील सहा कारखान्यांनी केले २२ लाख टन उसाचे गाळप

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 6, 2023 19:34 IST

यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे.

नंदुरबार : राज्यातील साखर हंगामाची सांगता झाली असून यावर्षी राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले असून त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे.

राज्यातील साखर हंगाम यंदा सरासरी १२१ दिवस चालला. गेल्यावर्षी हाच हंगाम १७३ दिवस सुरू होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी गाळप झाले असून यंदा १०६ सहकारी व १०४ खाजगी अशा २१० कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करुन १० कोटी ५३ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन कमी आहे.

खान्देशातील सहा कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आयान व आदिवासी या तीन साखर कारखान्यांनी १४ लाख २८ हजार ६३ टन ऊस गाळप केला आणि १४ लाख ८३ हजार ३०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा, चोपडा व संत मुक्ताई साखर कारखान्यांनी आठ लाख एक हजार १८० टन उसाचे गाळप करुन सात लाख ८९ हजार ३३७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी उतारा १०.३९ आहे. तर जळगाव जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.८५ आहे.

सर्वाधिक गाळप आयानचेराज्यातील २१० पैकी १० लाखापेक्षा अधिक टन उसाचे गाळप करणारे १९ कारखाने असून त्यात १३ वा क्रमांक नंदुरबार जिल्ह्यातील आयान शुगरचा आहे. या कारखान्याने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप करुन १०.५० च्या सरासरी उताऱ्याने ११ लाख १४ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने