शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायती हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 ची अंमलबजावणी सुरू आहे. यात गाव हगणदारीमुक्त झाल्यानंतर गावात शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्या आनुषंगिक इतर कामे करून गाव स्वच्छतेच्या बाबतीत शाश्वत ठेवणे म्हणजे गाव हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करणे होय. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टप्प्याटप्प्याने २०२४ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रथम टप्प्यात पुरुषोत्तमनगर, ता.शहादा, बोकळझर, लहान कडवान, वाटवी ता.नवापूर, आडची, कोठली खुर्द, ता. नंदुरबार या सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीत शासनाने ठरवून दिलेले शौचालयाचा नियमित वापर व शाळा व अंगणवाडी व सरकारी कार्यालयात शौचालय उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती हे निकष पूर्ण होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी सहाही ग्रामपंचाती हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.

हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित झालेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतींचा ओडीएफ प्लस दर्जा कायम ठेवून गावात शाश्वत स्वच्छता ठेवावी, तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी आपले गाव ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती या निकषाप्रमाणे पूर्वतयारी करून शासनाच्या या उपक्रमात सरपंच, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी केले आहे.