शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायती हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 ची अंमलबजावणी सुरू आहे. यात गाव हगणदारीमुक्त झाल्यानंतर गावात शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्या आनुषंगिक इतर कामे करून गाव स्वच्छतेच्या बाबतीत शाश्वत ठेवणे म्हणजे गाव हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करणे होय. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टप्प्याटप्प्याने २०२४ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रथम टप्प्यात पुरुषोत्तमनगर, ता.शहादा, बोकळझर, लहान कडवान, वाटवी ता.नवापूर, आडची, कोठली खुर्द, ता. नंदुरबार या सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीत शासनाने ठरवून दिलेले शौचालयाचा नियमित वापर व शाळा व अंगणवाडी व सरकारी कार्यालयात शौचालय उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती हे निकष पूर्ण होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी सहाही ग्रामपंचाती हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.

हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित झालेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतींचा ओडीएफ प्लस दर्जा कायम ठेवून गावात शाश्वत स्वच्छता ठेवावी, तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी आपले गाव ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती या निकषाप्रमाणे पूर्वतयारी करून शासनाच्या या उपक्रमात सरपंच, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी केले आहे.