शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायती हगणदारीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

नंदुरबार जिल्हा मार्च २०१८ मध्ये हगणदारीमुक्त घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 ची अंमलबजावणी सुरू आहे. यात गाव हगणदारीमुक्त झाल्यानंतर गावात शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन व त्या आनुषंगिक इतर कामे करून गाव स्वच्छतेच्या बाबतीत शाश्वत ठेवणे म्हणजे गाव हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करणे होय. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टप्प्याटप्प्याने २०२४ पर्यंत जिल्हा हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रथम टप्प्यात पुरुषोत्तमनगर, ता.शहादा, बोकळझर, लहान कडवान, वाटवी ता.नवापूर, आडची, कोठली खुर्द, ता. नंदुरबार या सहा ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. ग्रामपंचायतीत शासनाने ठरवून दिलेले शौचालयाचा नियमित वापर व शाळा व अंगणवाडी व सरकारी कार्यालयात शौचालय उपलब्धता व वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती हे निकष पूर्ण होत असल्याने १५ ऑगस्ट रोजी सहाही ग्रामपंचाती हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.

हगणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) घोषित झालेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतींचा ओडीएफ प्लस दर्जा कायम ठेवून गावात शाश्वत स्वच्छता ठेवावी, तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी आपले गाव ओडीएफ प्लस घोषित करण्यासाठी शौचालयाचा नियमित वापर, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छतेची दृश्यमान स्थिती या निकषाप्रमाणे पूर्वतयारी करून शासनाच्या या उपक्रमात सरपंच, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी केले आहे.