शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात अक्षय तृतीया सणाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली ...

वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खान्देशात घरोघरी गौराईची मांडणी केली जाते. ग्रामीण भागात या सणाला खूपच महत्त्व आहे. सासुरवाशिणी या सणाला आवर्जून माहेरी येतात. चैत्रात वसंत फुलतो, लहान मुले-मुली व तरुणांमध्ये आनंदाचे उधाण असते. हातात टिपऱ्या घेऊन गाणे म्हणत गौराईची स्तुती करीत या मुली नदीकाठाने गौराईला प्रसन्न करण्यासाठी वेशीच्या आत असलेल्या नदी-नाल्यावर जातात. गौराईला अहिराणीत ‘गवराई’ म्हणतात. गौरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. गौरी ही आर्यांची ‘सौंदर्य देवता’ म्हणून मानली जाते.

गौराईची मांडणी

गौराईची प्रतिकृती लाकडाची तयार केलेली असते. दरवर्षी चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपूर्वी गौराईला स्वच्छ पाण्याने धुतले जाते. गौराईचा मुखवटा कोरलेल्या दोन छोटे साधारणत: दहा-अकरा इंचीचे दोन लाकडी भाग व त्याच लाकडाला खाली एक फळी, दोन बारीक लाकडांच्या साहाय्याने जोडलेल्या असतात. लाकडी फळीवर सुंदर नक्षीकाम केलेले असते. पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजा करण्यापूर्वी गौराई ज्या ठिकाणी मांडायची आहे ती जागा शुभ्र मातीने सारवून घेतली जाते. मुली व स्त्रिया सोयीनुसार नक्षीकाम चित्रे काढतात. त्याला ‘गौराईचे घर’ म्हणतात. पाट टाकूनही गौराई बसवतात. गौराईला बाशिंग बांधतात.

गौराईचे बार...

दररोज सकाळी गावातल्या सर्व कुमारिका व सासरहून आलेल्या मुली तांब्या व खाऊ घेऊन टिपऱ्यांच्या आवाजात नदीकडे जातात. नदीवर जवळपासच्या गावाच्या मुलीही आलेल्या असतात. नदीकाठावर गाणे म्हणता-म्हणता शिव्याही सुरू होतात. त्याला खानदेशात ‘गौराईचे बार’ खेळणे म्हणतात. खेळ खेळताना मुली एकमेकीला घाणेरडे शब्द वापरतात. नदीतून किंवा नदीकाठी असलेल्या विहिरीवरून पाण्याचा तांब्या भरून त्यावर आंब्याची पाच पाने व एक कच्ची कैरी ठेवतात, याला ‘डवणा’ म्हणतात. घरी आल्यावर आंब्याची कोवळी पाने गौराईपुढे ठेवतात व पाणी तुळशीला टाकतात. अशा रीतीने १५ दिवस म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत हा खेळ सुरू राहतो.

गौराईची पूजा

गौराईच्या पूजेत रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ असते. टरबूज, डांगर व काकडीच्या बिया, आंब्याची लहान कैरी, गहू, हरभरा, शेंगा, मुरमुरे, बिस्कीट, शेव, शेवग्याच्या (सौंदळ) शेंगांची माळ आदी विविध प्रकारच्या माळा केल्या जातात. अक्षय तृतीयेच्या अगोदरच्या दिवशी सांजोऱ्या, करंज्या, कणकेच्या पुतळ्यांच्या माळा करून गौराईला घालतात. त्याचदिवशी मुली दोन पिवळे फडके करून ताटलीत धान्य घेऊन कुंभाराकडे जातात. कुंभाराकडे मातीच्या घोड्यावर एका मातीच्या माणसाला बसवले असल्याची प्रतिकृती असते. त्याच्यामागे डोक्यावर छत्रीसारखे केलेले असते. त्याला ‘शंकर’ असे म्हणतात. तो शंकर मुली घरी आणतात. तो गौराईचा पती असतो. गौराईला घेण्यासाठी आलेला असतो. मुली १५ दिवस झोक्यावर बसून गाणे म्हणून हा सण अतिउत्साहात साजरा करतात. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सर्व मुली शंकर व गौराईला नदीवर नेतात. शंकराला नदीत टाकून गौराईला घरी आणतात. गौराई त्या दिवसापासून सासरी गेली असे समजतात.

गौराईची गाणी

गौराईची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. गौराई ही नवसाची देवता नाही. गौराईची काही निवडक गाणी खान्देशात प्रसिद्ध आहेत.

केशर झणझणनी-

सोनानी सुतळी तडे मना कनेर पाणी भरणे व ।

केशर झणझणनी तटे मनी गौराई न्हायनी व।

गौराईनी माळ-

वाटेवर हिर कुणी खंदी व माय शंकर राजाने खंदणी व माय...

कसाना भरी उना ताट-

कसाना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।

शिय्यासना भरी उना ताट, ताट मनी गौराईले।।

(या गाण्यात लाडू, जलेबी, कलाकंद यासह विशिष्ट पदार्थांची नावे घेऊन गाणे म्हटले जाते.)

आथानी कैरी तथानी कैरी-

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय व।

कैरी तुटनी खडक फुटणा, जुई जुई पाणी व्हाय व।

गौरी पाणीले जाय-

चैत्र वैशाख अणे कथा खोकत जाय आज मनी गौर पाणीले जाय...

आदी गीते गाऊन माहेरवाशीण मुली आपला आनंद व्यक्त करतात आणि हा आगळा-वेगळा सण उत्साहात साजरा केला जातो.