शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कामामुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासाने शहादेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्यावर तात्पुरती पिवळी माती टाकून लहान वाहनांसाठी रस्ता रहदारीस खुला केला आहे. मात्र धुळीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. अशीच स्थिती डामरखेडा गावाजवळ असल्याने रविवारी झालेल्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.कोळदा ते खेतिया या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनधारकांसह रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण कामाला नागरिकांचा विरोध नसून त्यामुळे विकासच होणार आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक अक्षरश: या कामाला कंटाळले आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या गावातील नागरिकांना धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी पर्यायी मातीचे रस्ते तयार केले आहेत अशा रस्त्यांवर वारंवार पाणी शिंपडणे गरजेचे असताना ठेकेदाराचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणीही मातीकाम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाºया नागरिकांसह या परिसरातील व्यावसायिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सकाळी साडेसहा वाजेच्या अगोदर व सायंकाळी पाच वाजेपासून धुळीमुळे या रस्त्यावर समोरुन येणारे वाहनच दिसत नाही. वाहनधारकांना दिवे लावून तेवढा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ असून रविवारी मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जणांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.रस्त्याचे मातीकाम सुरू असताना ठेकेदाराने नियमानुसार त्या जागेवर दिवसातून तीनवेळा पाणी टाकणे बंधनकारक आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून दोन-तीन दिवस पाणी मारले जात नसल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त झाले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.