शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

रस्ता कामामुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासाने शहादेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्यावर तात्पुरती पिवळी माती टाकून लहान वाहनांसाठी रस्ता रहदारीस खुला केला आहे. मात्र धुळीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. अशीच स्थिती डामरखेडा गावाजवळ असल्याने रविवारी झालेल्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.कोळदा ते खेतिया या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनधारकांसह रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण कामाला नागरिकांचा विरोध नसून त्यामुळे विकासच होणार आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक अक्षरश: या कामाला कंटाळले आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या गावातील नागरिकांना धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी पर्यायी मातीचे रस्ते तयार केले आहेत अशा रस्त्यांवर वारंवार पाणी शिंपडणे गरजेचे असताना ठेकेदाराचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणीही मातीकाम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाºया नागरिकांसह या परिसरातील व्यावसायिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सकाळी साडेसहा वाजेच्या अगोदर व सायंकाळी पाच वाजेपासून धुळीमुळे या रस्त्यावर समोरुन येणारे वाहनच दिसत नाही. वाहनधारकांना दिवे लावून तेवढा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ असून रविवारी मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जणांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.रस्त्याचे मातीकाम सुरू असताना ठेकेदाराने नियमानुसार त्या जागेवर दिवसातून तीनवेळा पाणी टाकणे बंधनकारक आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून दोन-तीन दिवस पाणी मारले जात नसल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त झाले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.