शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

शहादा तालुक्यात वनकर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत सात हेक्टरचे जंगल तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

तालुक्याच्या पूर्व भागातील लंगडी भवानी परिसरात ७० हेक्‍टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षात ३३ ...

तालुक्याच्या पूर्व भागातील लंगडी भवानी परिसरात ७० हेक्‍टर जागेवर वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. या ठिकाणी गेल्या पाच वर्षात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात खैर साग आदी महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करण्यात आली होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान वनरक्षक दीपक परदेशी हे काम करत असताना अचानक दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. मद्याच्या नशेत असलेल्या या जमावाकडे प्राणघातक धारदार शस्त्रे होती. जमावाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांंसमोर शस्त्रांच्या सहाय्याने वृक्षतोडीला प्रारंभ केला. पाहता पाहता सुमारे एक तासाच्या आत या जमावाने सात हेक्टर वनजमिनींवरील डेरेदार वृक्षांची कत्तल करून पळ काढला.

या जमावाला वृक्षतोड करू नका असे वनविभागाचे कर्मचारी ओरडून सांगत असतानाही तुम्ही रस्त्यातून बाजूला व्हा, अन्यथा तुमचा रक्तपात करू अशी धमकी दिली. कोणत्याही प्रकारचे शस्त्र नसलेल्या वनकर्मचाऱ्यांनी निमूटपणे एका बाजूला थांबून हा प्रकार डोळ्यादेखत पाहिला. एक तासाच्या वृक्षतोडीनंतर हा जमाव तेथून पसार झाला

वनविभागाने याबाबत अज्ञात जमावावर गुन्हा दाखल केला असून लंगडी भवानी व शहाणा या दोन गावातील ग्रामस्थांच्या हद्दीच्या वादावरून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जमावाने केलेल्या या प्रकारामुळे हजारो डेरेदार वृक्ष तुटून पडल्याचे यावेळी दिसून येत होते.

तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरातील जंगलांवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीच्या घटना घडत आहे वनविभागाचे कर्मचारी या वृक्षतोडीला आळा घालण्यास असमर्थ ठरले आहे. विशेष म्हणजे शहादा वनक्षेत्रपाल हे पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून या पदाचा अतिरिक्त कार्यभार राणीपूरचे वनक्षेत्रपाल एस. के. खुणे यांच्याकडे असून ते नियमितपणे शहादा कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे. काही ठिकाणी वनविभागाच्या प्रोत्साहनाने तर काही ठिकाणी जमावामार्फत वृक्षांची कत्तल होत असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने जंगलाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असल्याने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक अज्ञात व्यक्तींचा जमाव राखीव वनक्षेत्रात आला. त्यांच्या हातात प्राणघातक धारदार शस्त्र होती. जमावाने वृक्षतोडीला प्रारंभ केला असता माझ्यासह वनमजुरांनी त्यांना वृक्षतोड करू नका असे सांगितल्यानंतर जमावातील काहींनी आम्हाला धमकावले व सांगितले की, तुम्ही आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा अन्यथा वृक्षाप्रमाणे तुमचीही कत्तल करू. आमच्याकडे जीव वाचवण्याचे व सुरक्षिततेचे कुठलेही साहित्य नसल्याने आम्ही प्रचंड मानसिक तणावात होतो. अवघ्या एक तासात या बेफाम जमावाने सुमारे सात हेक्टर जागेवरील वृक्षतोड केली असल्याची माहिती वनरक्षक दीपक परदेशी यांनी दिली.