शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नंदुरबार जिल्ह्यातून सात जण दोन वर्षांसाठी हद्दपार

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 30, 2023 18:50 IST

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली.

मनोज शेलार,  नंदुरबार : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता जिल्हा पोलिस दलाने नंदुरबार तालुक्यातील सात जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांची माहिती घेतली. त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करून नियमितपणे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यापासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जीवितास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले. त्याप्रमाणे अशा आरोपींवर कठोर प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असल्याने हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला.

नंदुरबार तालुका पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याकडून एका टोळीस हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. त्यानुसार हे आदेश काढण्यात आले. अर्जुन भिला पवार (२४)रा. चाकळे ता. नंदुरबार, सागर शिवनाथ पाडवी (१९)रा. चाकळे, ता. नंदुरबार, लखन बापू भिल (२२) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, ज्ञानेश्वर वसंत मोरे (१९) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, न्हानभाऊ भगवान भिल (२५) रा. शनिमांडळ, ता. नंदुरबार, किरण मंगलसिंग भिल (२५), रा. तिलाली, ता.नंदुरबार, विपुल सुरेश कोळी (२३), रा. तिलाली, ता.नंदुरबार  यांचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारPoliceपोलिस