शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळा भरली, पण नियोजनाची पाटी फुटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:50 IST

मनोज शेलार नंदुरबार वार्तापत्र शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठिवण्यासाठी मानसिक तयारी करून घेण्यात प्रशासन, शाळा आणि शिक्षण ...

मनोज शेलार

नंदुरबार वार्तापत्र

शाळा सुरू केल्या, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठिवण्यासाठी मानसिक तयारी करून घेण्यात प्रशासन, शाळा आणि शिक्षण विभाग कमी पडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. पहिल्या तीन दिवसात केवळ पाच ते १२ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. यापुढे किती राहतील याची शाश्वती नाही. शाळा सुरू झाल्यामुळे ऑनलाईन क्लास बंद झाले. एकीकडे ऑनलाईन बंद, दुसरीकडे शाळेत जाण्याची परवड यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती आहे. शाळा सुरू करतांना नियोजनाचा अभाव राहिला हे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत असल्यामुळे २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. शाळा सुरू करण्यासाठीच्या सर्व मार्गदर्शक सुचना शाळांना देण्यात आल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात शाळा सुरू झाल्याच्या दुुसऱ्या दिवसापर्यंत ७४ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली होती. अर्थात २५ टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झालेले नव्हती. सुदैवाने त्यातील केवळ ०.७ टक्केच अर्थात एक टक्का पेक्षाही कमी शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आढळले. शिक्षकेतर कर्मचारी देखील एक टक्केच्या आतच पॅाझिटिव्ह आढळले. त्यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील समाधानाची बाब आहे. सद्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू करण्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठविण्यास धजावत नाहीत. दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थीपेक्षा पालकांचे मोठे टेन्शन वाढिवणारे असते. जास्तीत जास्त गुणांनी पाल्य उत्तीर्ण व्हावा अशी अपेक्षा प्रत्येक पालकाची असते. त्यातच जर पाल्याला कोरोनाची लागण झाली तर त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते ही भिती पालकांमध्ये आहे. त्यामुळे देखील शाळेत पाठिवण्याबाबत पालक राजी होत नसल्याची स्थिती आहे. शिवाय अनेक शाळांनी हमीपत्र भरून घेतांना सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील हे वदवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेही पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ग्रामिण भागातून येणारे विद्यार्थी सार्वजनीक प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतील. तेंव्हा त्यांच्या सुरक्षेचे काय?,  मुुलींसाठी मानव विकास मिशनच्या बसेस नाहीत. ग्रामिण भागात एस.टी.च्या बसफेऱ्या नाहीत. शाळेच्या वेळेवर वाहन मिळणारच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी शाळेत येणार कसे? हा प्रश्न आहे. या सर्व बाबींचे नियोजन करणे आवश्यक होते, ते झाले नाही. कोरोनाविषयी काय उपाययोजना केल्या आहेत, घाबरून जाण्याचे कारण नाही, आम्ही आहोत ना? हा विश्वास पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात प्रशासनासह सर्वच यंत्रणा अपयशी ठरल्या.  या सर्व बाबींमुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचाच जास्त संभव आहे. आधीच पहिले सत्र अर्थात अर्धे शैक्षणिक वर्ष वायाच गेले आहे. त्यात ही गोंधळाची स्थिती राहिली तर ‘आडात ना पोहऱ्यात’ अशी स्थिती होऊ शकते. याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. शेजारच्या धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात सर्व नियोजन करून, पालकांमध्ये विश्वास निर्माण करून आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही ते झाले असते तर शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली असती असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.