शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

निसर्ग आणि पर्यटनाची खाण असलेला सातपुडा उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:12 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर तब्बल दशकभर दबदबा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकास ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर तब्बल दशकभर दबदबा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकास मात्र शोधूनही सापडेनासा झाला आहे. तोरणमाळ विकासाच्या घोषणा, प्रकाशा ते सारंगखेडा तापीतून बारमाही जलपर्यटन, सातपुड्याची हवाई सफर, आदिवासी होळीसाठी प्रसिद्ध काठीचा विकास या घोषणा हवेतच विरल्या. ना निधीची तरतूद झाली नाही योजनांना आकार मिळाला.नवे मंत्री नव्या पर्यटनाच्या योजना अशी स्थिती जिल्हा निर्मितीपासूनची आहे. आघाडी शासनाच्या काळात जिल्ह्याला तब्बल पाच वर्ष पर्यटनमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर भाजप शासनाच्या काळात स्वत: पर्यटनमंत्रीच जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु वर्षानुवर्षाच्या योजनांना नवीन पॉलिश मारण्यासारखी घोषणा करणे या व्यतिरिक्त त्यांच्या काळात काहीही झाले नाही. सारंगखेडाचा चेतक फेस्टीव्हल नावारूपास आला, नंतर शिवसेना आघाडीच्या काळात त्याला देखील ग्रहण लागले. त्यामुळे जिल्ह्यात सद्य स्थितीत एकही नाव घेण्यासारखा पर्यटन प्रकल्प नसल्याची खंत जिल्हावासीयांची आहे.तोरणमाळची पॅराग्लाईडींगयाठिकाणी रोपवेचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. त्याला ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याच भागात पॅराग्लाईडींग, पॅरासोलिन, रोपस्केपींगचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने इतर प्रकल्प तेथे होणे गरजेचे आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आज राणीपूरपासून पुढे तोरणमाळपर्यंत घाटाचा रस्ता आहे. या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण होणे अपेक्षित आहे.तापीतील जलपर्यटनतापीतील जलविहार प्रकल्पाचेही सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी ए.टी.कुंभार यांनी या संदर्भात प्रस्ताव तयार केला होता. प्रकाशा बॅरेज ते सारंगखेडा बॅरेजच्या दरम्यान तापीत प्रचंड जलसाठा राहणार आहे. या जलसाठ्यात जलविहारासाठी स्वतंत्र बोटी उपलब्ध व्हाव्यात, तापीच्या दुथडी नैसर्गिक सौदर्य फुलविण्यासाठी वृक्षारोपण व उद्याण उभारावे तसेच सारंगखेडा ते तोरणमाळ येथे पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हाव्यात अशा विविध योजनांचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे. हा प्रकल्पही झाल्यास पर्यटकांसाठी तो अधिक आकर्षित ठरेल.कारण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या गावाला व एकमुखी दत्ताच्या देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा या गावाला धार्मिक दृष्ट्या तेवढेच महत्त्व आहे. या दोन्ही ठिकाणी बॅरेज प्रकल्प उभे झाल्याने त्याला सौदर्याची जोडही मिळाली आहे.कला व संस्कृतीनंदुरबार जिल्ह्यातील निसर्ग सौदर्य, येथील संस्कृती, कला, ऐतिहासीक पार्श्वभूमी लक्षात घेता या भागात आंतरराष्टÑीय पर्यटन विकासालाही वाव आहे. येथील आदिवासी संस्कृती ही प्राचीन आहे. या संस्कृतीचे सर्वांनाच आकर्षण आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय ख्यातीचे आदिवासी संस्कृती संग्रहालय या भागात उभे राहू शकते.सातपुड्यातील निसर्ग सौदर्याचा विचार करता त्या भागातही पर्यटकांना आकर्षित करू शकतील, असे अनेक प्रकल्प उभे राहू शकतात. त्यातून या भागातील स्थलांतराचा आणि कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

सातपुड्याचे निगर्स सौंदर्य महाराष्टÑातील माथेरान, महाबळेश्वर, गुजरातमधील सापुतारा या ठिकाणांपेक्षाही तोरणमाळसह इतर स्थानांना अधिक सौदर्य संपदा लाभली आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी परिसर दुर्लक्षीत आहे.या भागात पर्यटन विकासाचे प्रकल्प सुरू झाल्यास देशभरातील पर्यटकांसाठी ते आकर्षित ठरू शकेल. त्यातून स्थानिक लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होवू शकतो.सपाटीच्या तापीच्या पट्ट्यापासून ते सातपुड्याच्या शेवटच्या पर्वतरांगेतील नर्मदा खोऱ्यापर्यंत हवाईसफरचाही प्रस्ताव हवेतच राहिला आहे.