शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बोडका झालेल्या सातपुड्याला गतवैभवाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सुमार वक्षतोडीमुळे सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. बोडका झाला असला तरी पर्यटनासह अनेक विकास कामांसाठी हा भाग अनुकूल ठरत आहे. त्यामुळे वृक्षलागवड अथवा पर्यटन विकासाच्या योजना मंजूर होताच या भागात प्रशासन यंत्रणा मोहोचणे आवश्यक आहे. ज्यामधून या परिसरात पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.नैसर्गिक संपदेने परिपूर्ण सातपुड्याच्या विकासात भर टाकण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रशासन तेथे पोहोचणे अपेक्षीत होते. परंतु प्रशासन यंत्रणेऐवजी वनसंपदा लाटणारा घटकच आधी तेथे पोहोचला. त्यामुळे या सातपुडा पर्वतरांगेचे आबाळ निर्माण झाले. वनसंपदा लाटण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या स्वार्थी घटकाने या परिसराच्या भवितव्याचा कदापी विचार केला नाही. निव्वळ फायदा करुन घेण्याचा नितीमत्तेमुळे या घटकाने वन संपदेचा फायदा घेतल्यानंतर संवर्धनासाठी त्यांनी अंशभरही योगदान दिले नाही. परिणामी हा सातपुडा अगदी बोडका झाला आहे.लुटारुंशिवाय प्रशासनाला देखील सातपुड्यातील वनसंपदेचे संवर्धन केले पाहिजे, या भागाचे भवितव्य अबाधित ठेवले पाहिजे असे वाटलेच नाही. कुठल्याही एका घटकाने भवितव्याचा विचार केला असता तर कदाचित सातपुड्याची ही अवस्था झालीही नसती, असे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांमार्फत सागण्यात येत आहे.या परिसर पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल आहेत. परंतु कुठल्याही यंत्रणेने त्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या भागाचे आबाळ अधिकच अवघड होत गेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या भागाच्या विकासासाठी केवळ प्रशासन व नेत्यांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. त्यातून बोडका झालेला सातपुड्याला गतवैभव प्राप्त होऊ शकेल.सातपुडा हा चार राज्यांमध्ये पसरला असला तरी धडगाव व मोलगी परिसरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या स्थळांचा देव-देवतांशी संबंध जोडले जात आहे. या स्थळांची पुढील पिढीला ओळख व्हावी, यासाठी या स्थळांचा विकास होणे नितांत आवश्यकता आहे.या भागात तोरणमाळसारखे काही ठिकाण आहे. त्यात धडगाव तालुक्यातील हातधुई येथील कोसळणाºया धबधब्यासह अन्य ठिकाणांचा उल्लेख करता येतो. हातधुईच्या धबधब्याचाही संबंध देवदेवताशी जोडले जात असून या घाटावर निसर्गपूजेवर आधारित गावदेवाची पूजा होते. महत्व प्राप्त त्यांचाही पर्यटनाच्या दिशेने विकास होणे आवश्यक आहे.तीन राज्यातून वाहणारी नर्मदा ही नदी सातपुड्यासह विंध्यपर्वत रांगेच्या मधोमध वाहत आहे. विंंध्यपर्वतचा भाग महाराष्टÑ अथवा नंदुरबार जिल्ह्याचा भाग नसला तरी नदीच्या दुसºया बाजूचा सातपुडा जिल्ह्यात येतो. त्यात धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावे येत आहे. त्यापैकी बहुतांश गावांचे सरदार सरोवरमुळे पूनर्वसन करण्यात आले असले तरी काठावरील अनेक गावांमध्ये आजही नागरिक वास्तव्यास आहे. त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही, तेही मुळ प्रवाहात येण्याच्या प्रतिक्षेत आहे.