शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धडगाव येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, संजय बागडे, शाहुराज मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश ...

बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, संजय बागडे, शाहुराज मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे उपस्थित होते.

पुढे डॉ.भारुड यांनी सांगितले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा. सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा चंदन, आंबा, महू, साग, बांबूची झाडे लावावीत. वृक्षारोपणासाठी मोठ्या रोपवाटिका तयार कराव्यात. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळेल. डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात झाडे लावता येतील. शेततळे तयार करणे, बंधारे बांधणे असे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे उपक्रम राबवावे. मनरेगा अंतर्गत बंधाऱ्यातून गाळ काढण्याचे काम घेण्यात यावे. ग्रामसेवक, कृषिसेवक यांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. नदी-नाल्याकिनारी विहीर किंवा विंधनविहिर करण्यात यावी. तहसीलदार सपकाळे यांनी कोरोना काळात 2500 कुटुंबाना शिधापत्रिका वाटप केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. गावातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्येक गावात पुढील 5 वर्षात मनरेगा अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यायोग्य कामांचा आराखडा तयार करावा. ही माहिती गावाच्या पुढील विकासासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी ग्रामस्थांशी संवाद साधावा असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री.पाटील म्हणाले, ग्रामस्थांचा सहभाग घेऊन कामे करावीत. जलसंधारणावर भर दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल.

उपवनसंरक्षक केवटे यांनी सांगितले की, डोंगर उतारावर शेती केल्यास काही काळानंतर मातीचा थर नष्ट होऊन जमीन खडकाळ आणि उजाड होईल, परिणामतः उपजीविकेचे साधनही नष्ट होईल. हे टाळण्यासाठी वनक्षेत्रावर अधिकाधिक वृक्ष लागवड करावी.

प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी काकरदा येथे फळबाग लागवड आणि मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली. कृषी विभागाने अधिकाधिक फळझाडे परिसरात लावावे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावातील नदीवर गॅबीयन बंधारे बांधून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य हरसिंगदादा पाडवी आणि गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी, वने, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती आदी विविध विभागाचे अधिकारी आणि डीएम फेलो उपस्थित होते.