शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धडगाव येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, संजय बागडे, शाहुराज मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश ...

बैठकीत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपवनसंरक्षक सुरेश केवटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, संजय बागडे, शाहुराज मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे उपस्थित होते.

पुढे डॉ.भारुड यांनी सांगितले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळते. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्यावा. सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा चंदन, आंबा, महू, साग, बांबूची झाडे लावावीत. वृक्षारोपणासाठी मोठ्या रोपवाटिका तयार कराव्यात. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळेल. डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात झाडे लावता येतील. शेततळे तयार करणे, बंधारे बांधणे असे पाणी अडविण्याचे आणि जिरविण्याचे उपक्रम राबवावे. मनरेगा अंतर्गत बंधाऱ्यातून गाळ काढण्याचे काम घेण्यात यावे. ग्रामसेवक, कृषिसेवक यांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा. नदी-नाल्याकिनारी विहीर किंवा विंधनविहिर करण्यात यावी. तहसीलदार सपकाळे यांनी कोरोना काळात 2500 कुटुंबाना शिधापत्रिका वाटप केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. गावातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रत्येक गावात पुढील 5 वर्षात मनरेगा अंतर्गत प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यायोग्य कामांचा आराखडा तयार करावा. ही माहिती गावाच्या पुढील विकासासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी ग्रामस्थांशी संवाद साधावा असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री.पाटील म्हणाले, ग्रामस्थांचा सहभाग घेऊन कामे करावीत. जलसंधारणावर भर दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल.

उपवनसंरक्षक केवटे यांनी सांगितले की, डोंगर उतारावर शेती केल्यास काही काळानंतर मातीचा थर नष्ट होऊन जमीन खडकाळ आणि उजाड होईल, परिणामतः उपजीविकेचे साधनही नष्ट होईल. हे टाळण्यासाठी वनक्षेत्रावर अधिकाधिक वृक्ष लागवड करावी.

प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी काकरदा येथे फळबाग लागवड आणि मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी केली. कृषी विभागाने अधिकाधिक फळझाडे परिसरात लावावे. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावातील नदीवर गॅबीयन बंधारे बांधून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य हरसिंगदादा पाडवी आणि गणेश पराडके यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी, वने, सामाजिक वनीकरण, पंचायत समिती आदी विविध विभागाचे अधिकारी आणि डीएम फेलो उपस्थित होते.