धडगावं तालुक्यातील बहुतांश मजूरवर्ग शहादा, नंदुरबार, शिंदखेडा, व शिरपूर तालुक्यातील विविध गावामध्ये रोजगारा निमित्त स्थायिक झाले आहेत. सध्या गहू, हरभरा, दादर आदी पिकांच्या कापणीचा हंगाम जोरावर सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांना वेळेत मजूर उपलब्ध होत नसल्याने मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत होती. बहुतेक पाड्यातील मजूर वर्ग गावाकडे स्थायिक झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळून पीक काढणी करता येत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र बामखेडा सह परिसरात दिसून येत आहे. मात्र गेल्या पाच, सहा महिन्यापासून रोजगारा निमित्त विविध ठिकाणी स्थलांतर झालेले आदिवासी मजूर आता गाव वस्तीकडे परतू लागल्याने ओस पडलेली पाडे, वस्त्या पुन्हा गजबजू लागल्या असून शेतीसाठी मजूर उपलब्ध होणार आहेत.
रोजगारासाठी स्थलांतर झालेली कुटुंबाची घरवापसीने गावे गजबजू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST