शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

बाजार समित्यांना निर्बंध मुक्त केल्याने शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री येणारा माल व्यापारी बांधावर जावून किंवा शेतकरी परस्पर बाहेरच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री येणारा माल व्यापारी बांधावर जावून किंवा शेतकरी परस्पर बाहेरच व्यापाऱ्यास विक्री करु शकणार आहेत़ केंद्रशासनाने बाजार समित्यांचे निर्बंध उठवले असून याचा फटका शेतकरी आणि व्यापारी या दोघांना सर्वाधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे़त्या-त्या तालुक्यात असलेल्या बाजार समितीत त्याच तालुक्यात उत्पादित करण्यात आलेला माल घेऊन शेतकरी त्याची विक्री करत होता़ यातून तालुकानिहाय कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण करुन शेतकऱ्यांकडून हमीभावानेच व्यापारी माल खरेदी करतील याकडे लक्ष दिले जात होते़ भाजीपाला, धान्य, कापूस, तेलबिया उत्पादन आणि फळे यांचे व्यवहार वर्षभर बाजार समितीत सुरू होते़ हे व्यवहार बाहेरही झाले तरी बाजार समितीची ‘पट्टी’ व्यापाºयास भरावी लागत होती़ परंतु केंद्र शासनाने बाजार समिती निर्बंध मुक्त केल्याने बोगस व्यापाºयांचा सुळसुळाट होवून शेतकºयांची फसवणूक होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यात प्रामुख्याने मिरची, केळी आणि पपई या तिन उत्पादनांची बाजारपेठ मोठी आहे़ मिरची खरेदी विक्रीचे व्यवहार आजवर बाजार समितीच्या बाहेर झालेले नाहीत़ या कायद्याच्या अंमलबजावणीत असलेले ओपन मार्केट सिस्टिम शेतकºयांना घातक ठरू शकते असेही मत व्यक्त करण्यात आले़ दरम्यान जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये बाहेरील तालुक्यातून माल खरेदी विक्रीसाठी पूर्वी पासून येत असल्याने त्यातून खूप मोठा फरक पडणार नाही़

४नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव येथे बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ त्यांना जोडून उपबाजार समित्याही आहेत़ या समित्यांच्या अखत्यातरीत त्या-त्या तालुक्यातील शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत असलेल्या मालावर लक्ष ठेवण्यात येते़ व्यवहारात अडचणी आल्यास व्यापाऱ्यांना समज देण्याचे कामही केले जाते़ विश्वासावर बºयाच वर्षांपासून हे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात व्यवहार सुरू आहेत़ शासनाने आणलेल्या ओपन मार्केट पॉलिसीमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विक्री करता येणार आहे़ या व्यवहारांपोटी स्थानिक बाजार समितीला कर देण्याची गरज नाही़ परंतु दुसरीकडे बाहेरील व्यापाºयांकडून वापरली जाणारी वजन मापे आणि व्यवहार याबाबत योग्य ती माहिती नसल्यास फसवणूक होवू शकते़

केंद्र शासनाने जाहिर केलेल्या धोरणाबाबत आताच काही सांगणे उचित होणार नाही़ दोन वर्षात या निर्णयाचे फायदे तोटे कळतील़ यापूर्वी शेतकरी-व्यापारी यांच्यातील व्यवहारांबाबत मार्केट कमिटी जी सुरक्षा पुरवत होती़ तीन यापुढे देणे अशक्य होताना दिसते़ बाहेर होणाऱ्या व्यवहारासाठीची वजन मापे किंवा परवाने यांची तपासणी होवू शकणार नाही़-हेमंत चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा़

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे सुरक्षा देत होती़ विविध व्यवहारात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी प्रयत्नशील होती़ ओपन पॉलिसीमुळे शेतकरी माल कुठेही माल विक्री करण्यासाठी मुक्त असतील़ यातून त्यांचे नुकसान होणार आहे़-योगेश अमृतकर, सचिव, बाजार समिती, नंदुरबाऱ

केंद्र शासनाने धोरण काय आहे़ आधी ते अभ्यासावे लागेल़ व्यापारी हे कायम विश्वासार्ह व्यवहार करत आले आहेत़ धान्य आणि मिरचीचे व्यवहार हे कोट्यावधीच्या घरात आहेत़ शेतकरी यापूर्वीही विश्वासाने येथे येत होता़ यानंतरही नंदुरबार बाजार समितीतच येणार आहे़-किशोर वाणी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन नंदुरबाऱ