शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अनाथांसोबत नाते आणि निराधारांना आधार यातून जीवन होतयं साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळोदा शहरात हातोडा रस्त्याला लागून एका कोपऱ्यात निराधार आणि अनाथ बालकांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तळोदा शहरात हातोडा रस्त्याला लागून एका कोपऱ्यात निराधार आणि अनाथ बालकांचे निवासी वसतीगृह आहे़ किमान १०० पेक्षा अधिक मुला-मुलींचे आश्रमस्थान असलेल्या या जागेवर श्रम आणि माया यातून जीवन साकारलं जात आहे़ निराधारांचा हा आधार होण्याचं काम करत आहेत वंदनाबाई तोरवणे़मूळ साक्री तालुक्यातील रहिवासी असलेल्या वंदनाबाई तोरवणे यांनी २० वर्षापूर्वी तळोदा दावलशा बाबा उन्नती मंडळाचे कल्याणी बालसदन सुरु केले होते़ प्रामुख्याने निराधार असलेल्या मुलामुलींनी कळत्या वयात येईलपर्यंत छत देऊन त्यांना शिक्षण आणि संस्कार देण्याचा उपक्रम होता़ प्रारंभी सर्वांनाच येतात तशा अडचणी वंदना तोरवणे यांनाही आल्या़ परंतू सतत मुलांच्या संपर्कात राहून त्यांना प्रगल्भ बनवण्यासाठी झटत राहिल्याने त्यांनी रोवलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे़ तळोदा शहरातील हे कल्याणी बालसदन दुर्गम आदिवासी भागासह सपाटीच्या गावांमधील निराधार बालकांसाठी हक्काचे स्थान आहे़ याठिकाणी आजघडीस किमान १०० पेक्षा अधिक मुले आणि तेवढ्याच मुली आश्रित म्हणून आहे़ निवास आणि भोजनासोबत शिक्षणाची गरज भागवून त्यांना समाजात वावरण्याचे बळ या माध्यमातून देण्यात येत आहे़ सेवाभावी नागरिकांचा पाठिंबा आणि शासनाच्या विविध योजना या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमातून आजवर १०० पेक्षा अधिक युवतींचे विवाह करुन त्यांना सुखी संसाराला लावण्यात वंदनाबार्इंचा मोठा पुढाकार आहे़ सोबतच १८ वर्षापर्यंत येथे शिक्षण घेऊन बाहेरील शहरांमध्ये छोट्या-मोठ्या हुद्द्यांवर नोकरी करणाºया युवकवर्गाचंीही संख्याही कमी नाही़ हे युवक वर्षातून एकदा येथे भेटही देतात़

४प्रामुख्याने माता पिता किंवा एकल पालकत्त्व असलेल्या मुले आणि मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी कल्याणी बालसदनाच्या वंदनाबाई तोरवणे यांनी गेल्या २० वर्षात समर्थपणे पेलली आहे़ बऱ्याच वेळा मातापिता किंवा नातेवाईक यांची कोणतीही माहिती नसलेले बेवारस बालकांचाही सांभाळ करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न येथून करण्यात येतो़ मुलांना भविष्यात अडचणी येऊ नयेत तसेच त्यांच्या आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून स्वत:ची कामे स्वत:च करण्याचा दंडक येथे आहे़ मुलींकडून परसबाग फुलवण्यासह इतर कामांना प्राधान्याने केले जाते़ यातून त्यांच्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाल्याचे वंदनाबाई तोरवणे सांगतात़ नंदुरबार जिल्ह्यात चिमुकल्या बालकांना एवढ्या चांगल्या प्रकारे प्रवाहात आणण्याचे हे उल्लेखनिय कार्य असल्याचे नेहमीच सांगण्यात येते़ मुला-मुलींची राहणीमान सुधारावी यासाठी त्यांच्यावर आरोग्य चांगले ठेवण्याबाबत संस्कार करण्याची जबाबदारीही वंदनाबाई आणि त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी आनंदाने स्विकारत आहेत़४अनाथ आणि एकपालकत्त्व असलेल्या मुलींचे विवाह लावून त्यांना संसाराला लावण्यासह वंदनाबाई ह्या तळोदा तालुक्याच्या विविध भागातील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिलांसाठी कार्य करतात़ यात दारिद्र्य रेषेखालील महिलांना विविध योजनांचा न्याय मिळावा यासाठी त्याचा पाठपुरावा शासनाकडे करत आहेत़ महिलांना रेशन कार्ड मिळवून देण्यासह त्यांचे जीवनमान सुधारुन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून परिश्रम घेण्यात येत आहे़ यापार्श्वभूमी येत्या काळात महिलांची रोजगार चळवळ उभारण्याचा त्यांचा मानस आहे़