शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 29, 2023 21:24 IST

लोकसहभागातून बंधारा

नंदुरबार : जलसमृद्धी असेल तर गावाच्या शाश्वत विकासाला चांगली गती मिळते. गावातील बहुतांश समस्या पाण्याच्या माध्यमातून सुटत असल्याचे ओळखून अतिदुर्गम भागातील कात्री, ता. धडगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खाट नदीच्या बंधाऱ्यावर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात १०० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला असल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

गावाचा शाश्वत विकास हा जल समृद्धीभोवती केंद्रित होतो. मुबलक पाण्यामुळे गरिबी निर्मूलन, आरोग्यदायी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी, सन्मान जनक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरणपूरक जीवन यासह विकासाचा अन्य उद्देश साध्य होत असल्याचा विचार घेत कात्री ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत गाव आणि पाड्यांवर खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवड देखील करण्यात आली.

उपक्रमशील कात्रीच्या प्रत्येक वाड्या-पाड्यातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. उपक्रमांतर्गतच गावातून वाहणाऱ्या खाट नदीवर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष जत्र्या पावरा, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, सरपंच संदीप वळवी, उपसरपंच सुभाष पाडवी, कृषी अधिकारी महाले, कृषी सहायक जगदीश पाडवी, सुनील वळवी, वरखेडीचे मंगेश वळवी, हातधुईचे सरपंच विक्रम तडवी, दिलीप वसावे, दिपक पाडवी, उदय पाडवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.

जल समृद्धीतच आत्मनिर्भरता

प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आज कात्री गावात मोठ्या बागा नाहीत. परंतु तेथील प्रत्येक शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यांचे उत्पादन घेत आहे. याशिवाय पेरू, डाळींब, लिंबू आदी फळांचे उत्पादनही घेत आहे. या उत्पादनासाठी वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हातभार मिळत असल्याने आत्मनिर्भर नागरिकांमध्ये भर पडत आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षतेत केवळ शेती व जनजीवनावरच परिणाम होत नाही तर गाई-गुरे व अन्य पाळीव प्राण्यांनाही त्याची झळ पोहोचते, ही संभाव्य समस्या लक्षात घेत बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा गावाच्या मध्यवर्ती असल्याने पाटीलपाडा, पाडावपाडा, खासाडपाडा, आमलीपाडा व अन्य पाड्यांना त्याचा आधार मिळणार आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री तथा संचालक, जिल्हा सहकारी बँक.

टॅग्स :Waterपाणी