शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 29, 2023 21:24 IST

लोकसहभागातून बंधारा

नंदुरबार : जलसमृद्धी असेल तर गावाच्या शाश्वत विकासाला चांगली गती मिळते. गावातील बहुतांश समस्या पाण्याच्या माध्यमातून सुटत असल्याचे ओळखून अतिदुर्गम भागातील कात्री, ता. धडगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खाट नदीच्या बंधाऱ्यावर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात १०० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला असल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

गावाचा शाश्वत विकास हा जल समृद्धीभोवती केंद्रित होतो. मुबलक पाण्यामुळे गरिबी निर्मूलन, आरोग्यदायी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी, सन्मान जनक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरणपूरक जीवन यासह विकासाचा अन्य उद्देश साध्य होत असल्याचा विचार घेत कात्री ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत गाव आणि पाड्यांवर खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवड देखील करण्यात आली.

उपक्रमशील कात्रीच्या प्रत्येक वाड्या-पाड्यातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. उपक्रमांतर्गतच गावातून वाहणाऱ्या खाट नदीवर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष जत्र्या पावरा, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, सरपंच संदीप वळवी, उपसरपंच सुभाष पाडवी, कृषी अधिकारी महाले, कृषी सहायक जगदीश पाडवी, सुनील वळवी, वरखेडीचे मंगेश वळवी, हातधुईचे सरपंच विक्रम तडवी, दिलीप वसावे, दिपक पाडवी, उदय पाडवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.

जल समृद्धीतच आत्मनिर्भरता

प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आज कात्री गावात मोठ्या बागा नाहीत. परंतु तेथील प्रत्येक शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यांचे उत्पादन घेत आहे. याशिवाय पेरू, डाळींब, लिंबू आदी फळांचे उत्पादनही घेत आहे. या उत्पादनासाठी वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हातभार मिळत असल्याने आत्मनिर्भर नागरिकांमध्ये भर पडत आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षतेत केवळ शेती व जनजीवनावरच परिणाम होत नाही तर गाई-गुरे व अन्य पाळीव प्राण्यांनाही त्याची झळ पोहोचते, ही संभाव्य समस्या लक्षात घेत बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा गावाच्या मध्यवर्ती असल्याने पाटीलपाडा, पाडावपाडा, खासाडपाडा, आमलीपाडा व अन्य पाड्यांना त्याचा आधार मिळणार आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री तथा संचालक, जिल्हा सहकारी बँक.

टॅग्स :Waterपाणी