शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 29, 2023 21:24 IST

लोकसहभागातून बंधारा

नंदुरबार : जलसमृद्धी असेल तर गावाच्या शाश्वत विकासाला चांगली गती मिळते. गावातील बहुतांश समस्या पाण्याच्या माध्यमातून सुटत असल्याचे ओळखून अतिदुर्गम भागातील कात्री, ता. धडगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खाट नदीच्या बंधाऱ्यावर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात १०० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला असल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

गावाचा शाश्वत विकास हा जल समृद्धीभोवती केंद्रित होतो. मुबलक पाण्यामुळे गरिबी निर्मूलन, आरोग्यदायी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी, सन्मान जनक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरणपूरक जीवन यासह विकासाचा अन्य उद्देश साध्य होत असल्याचा विचार घेत कात्री ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत गाव आणि पाड्यांवर खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवड देखील करण्यात आली.

उपक्रमशील कात्रीच्या प्रत्येक वाड्या-पाड्यातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. उपक्रमांतर्गतच गावातून वाहणाऱ्या खाट नदीवर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष जत्र्या पावरा, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, सरपंच संदीप वळवी, उपसरपंच सुभाष पाडवी, कृषी अधिकारी महाले, कृषी सहायक जगदीश पाडवी, सुनील वळवी, वरखेडीचे मंगेश वळवी, हातधुईचे सरपंच विक्रम तडवी, दिलीप वसावे, दिपक पाडवी, उदय पाडवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.

जल समृद्धीतच आत्मनिर्भरता

प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आज कात्री गावात मोठ्या बागा नाहीत. परंतु तेथील प्रत्येक शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यांचे उत्पादन घेत आहे. याशिवाय पेरू, डाळींब, लिंबू आदी फळांचे उत्पादनही घेत आहे. या उत्पादनासाठी वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हातभार मिळत असल्याने आत्मनिर्भर नागरिकांमध्ये भर पडत आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षतेत केवळ शेती व जनजीवनावरच परिणाम होत नाही तर गाई-गुरे व अन्य पाळीव प्राण्यांनाही त्याची झळ पोहोचते, ही संभाव्य समस्या लक्षात घेत बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा गावाच्या मध्यवर्ती असल्याने पाटीलपाडा, पाडावपाडा, खासाडपाडा, आमलीपाडा व अन्य पाड्यांना त्याचा आधार मिळणार आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री तथा संचालक, जिल्हा सहकारी बँक.

टॅग्स :Waterपाणी