शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: October 29, 2023 21:24 IST

लोकसहभागातून बंधारा

नंदुरबार : जलसमृद्धी असेल तर गावाच्या शाश्वत विकासाला चांगली गती मिळते. गावातील बहुतांश समस्या पाण्याच्या माध्यमातून सुटत असल्याचे ओळखून अतिदुर्गम भागातील कात्री, ता. धडगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खाट नदीच्या बंधाऱ्यावर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात १०० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला असल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

गावाचा शाश्वत विकास हा जल समृद्धीभोवती केंद्रित होतो. मुबलक पाण्यामुळे गरिबी निर्मूलन, आरोग्यदायी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी, सन्मान जनक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरणपूरक जीवन यासह विकासाचा अन्य उद्देश साध्य होत असल्याचा विचार घेत कात्री ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत गाव आणि पाड्यांवर खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवड देखील करण्यात आली.

उपक्रमशील कात्रीच्या प्रत्येक वाड्या-पाड्यातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. उपक्रमांतर्गतच गावातून वाहणाऱ्या खाट नदीवर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष जत्र्या पावरा, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, सरपंच संदीप वळवी, उपसरपंच सुभाष पाडवी, कृषी अधिकारी महाले, कृषी सहायक जगदीश पाडवी, सुनील वळवी, वरखेडीचे मंगेश वळवी, हातधुईचे सरपंच विक्रम तडवी, दिलीप वसावे, दिपक पाडवी, उदय पाडवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.

जल समृद्धीतच आत्मनिर्भरता

प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आज कात्री गावात मोठ्या बागा नाहीत. परंतु तेथील प्रत्येक शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यांचे उत्पादन घेत आहे. याशिवाय पेरू, डाळींब, लिंबू आदी फळांचे उत्पादनही घेत आहे. या उत्पादनासाठी वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हातभार मिळत असल्याने आत्मनिर्भर नागरिकांमध्ये भर पडत आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षतेत केवळ शेती व जनजीवनावरच परिणाम होत नाही तर गाई-गुरे व अन्य पाळीव प्राण्यांनाही त्याची झळ पोहोचते, ही संभाव्य समस्या लक्षात घेत बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा गावाच्या मध्यवर्ती असल्याने पाटीलपाडा, पाडावपाडा, खासाडपाडा, आमलीपाडा व अन्य पाड्यांना त्याचा आधार मिळणार आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री तथा संचालक, जिल्हा सहकारी बँक.

टॅग्स :Waterपाणी