शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुरूस्तीसाठी रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर बुधवारी नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर बुधवारी नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान असलेल्या जीवघेण्या रस्त्याच्या कामासाठी भारतीय जनता पक्षातर्फे भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. या वेळी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उद्यापासून काम सुरू होणार आहे.नेत्रंग ते शेवाळी महामार्गावरील तळोदा ते गव्हाळी दरम्यान असलेला महामार्ग हा अतिशय जीवघेणा झाला असून, मंगळवारी नयनशेवडी गावाजवळ अपघातात दोन जण जागीच ठार झाले होते. बुधवारी भारतीय जनता पक्षातर्फे भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर दुपारी ११ वाजता रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी महामार्गाचे सहाय्यक अभियंता अक्षय कांकरीया यांनी उद्यापासूनच रस्त्याच्या स्कॅनिंगचे काम सुरू करून लगेचच कामाला सुरुवात होणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी प्रभारी तहसीलदार विजय कछवे, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेश अमृतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, रूपाली महाजन हे अधिकारी उपस्थित होते.तळोदा नाका ते गव्हाळी दरम्यान असलेल्या ३५ किलो मीटरच्या महामार्गासाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सहाय्यक अभियंता अक्षय कांकरीया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, दिनेश खरात, नीलेश जैन, मनोज सोनार, सुधीर पाडवी, बापू महिरे, जीवन शिंदे, मुन्ना क्षत्रिय, प्रदिप पाडवी, वसंत पाडवी, भुपेंद्र पाडवी, यशवंत नाईक, रमेश नाईक आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.नेत्रंग ते शेवाळी महामार्गाची पावसाळ्यात अत्यंत दुरवस्था झाली असताना या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी वेळोवेळी लेखी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या वेळी संबंधितांनी महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासन वेळोवेळी देऊन वेळ निभावून नेत होते. मात्र बुधवारी आंदोलनाचा पवित्रा उचलून सुमारे तासभर वरखेडी नदी पुलावर रस्ता रोको केल्याने संबंधित अभियंता अक्षय कांकरिया यांनी उद्यापासून महामार्गाचे काम सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. परंतु त्यांच्या आश्वासनावर विश्वास नसल्याने तहसीलदार विजय कचवे यांना बोलावून त्यांच्यासमोर स्वत: तहसीलदार जबाबदारी घेत असतील तर हे आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. तहसीलदार कचवे यांनी त्वरित मागणी मान्य करीत संबंधितांकडून मी आश्वासन देतो असे सांगितल्याने आंदोलन मागे घेतले.शेवाळे नेत्रग महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारक या रस्त्याला अगदीच कंटाळले होते या महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत होते. तसेच मोठ्या अपघातांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या महामार्गाचे काम या आंदोलनामुळे त्वरित सुरू होणार असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या महामार्गाचे काम सुरू होणार असल्याचे या महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला कळल्याने ट्रकचालकाने आंदोलनकर्त्यांचे आभार मानले.