शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

रेल्वे मार्ग बनला स्थलांतरीतांचा पायवाटेचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:34 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील मजुरांच्या पायवाटेचा मार्ग बनला आहे. रोज शेकडो मजूर या वाटेवरून प्रवास करीत असून, त्यांना थांबवून त्यांची जबाबदारी कोण घेणार या भूमिकेतून या मजुरांचा शेकडो किलोमीटरचा मार्गही सुकर होत आहे.लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था दयनिय झाली आहे. गाव सोडून शेकडो किलोमीटर अनोळखी परिसरात रोजगारासाठी कामाला आलेल्या मजुरांना सध्याच्या स्थितीत कुणी वाली नसल्याची अवस्था आहे. माणुसकीच्या नात्याने दोन-चार दिवस अनोळखी ठिकाणी खान्या पिण्याची व्यवस्था होते. पण पंधरा-पंधरा दिवस मात्र त्यांना अपेक्षित सोयीसुविधा मिळणे काहीसे अवघडच झाले आहे. त्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर लॉकडाऊन वाढल्याने आता हळू हळू आपल्या गावाकडची वाट धरत आहेत. गाव शेकडो किलोमीटर लांब असले तरी घोळक्या घोळक्याने हे मजूर पायीच ‘जो होगा देखा जायेगा’ या भावनेतून गावाकडे निघाले आहेत. सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्याभरापासून येणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. रेल्वे मार्ग धरून त्यावरच पायी हे मजूर येत आहेत. सुरतहून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेशातील गावांमध्ये जाण्यासाठी हे मजूर निघाले आहेत.सोमवारी सुरतहून मध्यप्रदेशातील जबलपूरला जाणारे १४ मजूर नंदुरबार येथील रेल्वे बोगद्या जवळ रेल्वे मार्गावरच पोलिसांनी अडवले. तीन दिवसांपासून ते सूरतहून निघाले आहेत. या मजुरांशी चर्चा केली असता ते सुरतहून निघाल्यापासून रेल्वे मार्गाने रस्त्यावर ते थांबत थांबत येत आहेत. ज्याठिकाणी ते थांबले तेथे गावकऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था होत आहे. काही ठिकाणी पोलिसांनीही अडविले. त्यांनीही खाण्यापिण्यासाठी दिले. लोकांचा हा पाहूणचार घेत ते गावाकडे निघाले आहेत. असाच प्रवास सुरू राहिला तर साधारणत: १५ दिवसात ते गावाला पोहोचतील असा त्यांना विश्वास आहे.दरम्यान, या मजुरांसदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सूचना केली असता त्यांनी त्या मजुरांना शेल्टर होममध्ये ठेवता येत नसल्याचे सांगितले. हे मजूर नियम तोडून येत असल्याने त्यांना जिल्ह्याच्या सिमेवरच अडवून पोलिसांनी कारवाई करायला हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे या मजुरांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनही धजावत आहेत. अर्थातच त्यामागची कारणे काहीही असली तरी परराज्यात स्थलांतरीत असलेल्या मजुरांच्या सोयीसुविधांबाबत तेथील स्थानिक सरकारच्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे दिसून येत आहे.साहब तीन दिनसे पैदल चल रहे है, कहाँ पुलीस का दंडा मिला तो कही पे लोगोने खाना खिलाया. रस्ते मे कुछ भी मिलो सब सहके घरतक पोहोचना है. क्योकी आगे क्या होगा कोई भरोसा दिखता नही.-सुरेशकुमार, स्थलांतरीत मजूर, जबलपूर