शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

रेल्वे मार्ग बनला स्थलांतरीतांचा पायवाटेचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:34 IST

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील ...

रमाकांत पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे सध्या प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग सध्या परराज्यातील मजुरांच्या पायवाटेचा मार्ग बनला आहे. रोज शेकडो मजूर या वाटेवरून प्रवास करीत असून, त्यांना थांबवून त्यांची जबाबदारी कोण घेणार या भूमिकेतून या मजुरांचा शेकडो किलोमीटरचा मार्गही सुकर होत आहे.लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था दयनिय झाली आहे. गाव सोडून शेकडो किलोमीटर अनोळखी परिसरात रोजगारासाठी कामाला आलेल्या मजुरांना सध्याच्या स्थितीत कुणी वाली नसल्याची अवस्था आहे. माणुसकीच्या नात्याने दोन-चार दिवस अनोळखी ठिकाणी खान्या पिण्याची व्यवस्था होते. पण पंधरा-पंधरा दिवस मात्र त्यांना अपेक्षित सोयीसुविधा मिळणे काहीसे अवघडच झाले आहे. त्यामुळे परराज्यात अडकलेले मजूर लॉकडाऊन वाढल्याने आता हळू हळू आपल्या गावाकडची वाट धरत आहेत. गाव शेकडो किलोमीटर लांब असले तरी घोळक्या घोळक्याने हे मजूर पायीच ‘जो होगा देखा जायेगा’ या भावनेतून गावाकडे निघाले आहेत. सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्याभरापासून येणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. रेल्वे मार्ग धरून त्यावरच पायी हे मजूर येत आहेत. सुरतहून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेशातील गावांमध्ये जाण्यासाठी हे मजूर निघाले आहेत.सोमवारी सुरतहून मध्यप्रदेशातील जबलपूरला जाणारे १४ मजूर नंदुरबार येथील रेल्वे बोगद्या जवळ रेल्वे मार्गावरच पोलिसांनी अडवले. तीन दिवसांपासून ते सूरतहून निघाले आहेत. या मजुरांशी चर्चा केली असता ते सुरतहून निघाल्यापासून रेल्वे मार्गाने रस्त्यावर ते थांबत थांबत येत आहेत. ज्याठिकाणी ते थांबले तेथे गावकऱ्यांकडून जेवणाची व्यवस्था होत आहे. काही ठिकाणी पोलिसांनीही अडविले. त्यांनीही खाण्यापिण्यासाठी दिले. लोकांचा हा पाहूणचार घेत ते गावाकडे निघाले आहेत. असाच प्रवास सुरू राहिला तर साधारणत: १५ दिवसात ते गावाला पोहोचतील असा त्यांना विश्वास आहे.दरम्यान, या मजुरांसदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सूचना केली असता त्यांनी त्या मजुरांना शेल्टर होममध्ये ठेवता येत नसल्याचे सांगितले. हे मजूर नियम तोडून येत असल्याने त्यांना जिल्ह्याच्या सिमेवरच अडवून पोलिसांनी कारवाई करायला हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे या मजुरांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस प्रशासनही धजावत आहेत. अर्थातच त्यामागची कारणे काहीही असली तरी परराज्यात स्थलांतरीत असलेल्या मजुरांच्या सोयीसुविधांबाबत तेथील स्थानिक सरकारच्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे दिसून येत आहे.साहब तीन दिनसे पैदल चल रहे है, कहाँ पुलीस का दंडा मिला तो कही पे लोगोने खाना खिलाया. रस्ते मे कुछ भी मिलो सब सहके घरतक पोहोचना है. क्योकी आगे क्या होगा कोई भरोसा दिखता नही.-सुरेशकुमार, स्थलांतरीत मजूर, जबलपूर