शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तुंचे योग्य नियोजन-पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील कोरोना संकटाचा सामना सर्व मिळून एकत्रितपणे करू आणि या संकटावर मात करू, असा विश्वास पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी व्यक्त केला. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचेही ते म्हणाले.पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांनी सांगितले, विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू मिळण्याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे. मात्र देशातील जीवनावश्यक वस्तू व सेवाबाबतच्या कायद्यानुसार आवश्यक वस्तू व सेवा नागरिकांना उपलब्ध होतील. नागरिकांनी घरातच राहावे, इतरांच्या संपर्कात येऊ नये. नागरिकांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. आपण स्वत: प्रशासनाच्या संपर्कात आहोत. गावपातळीवर भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे नियोजनदेखील झाले आहे. अन्नधान्याचा साठादेखील पुरेशा प्रमाणात आहे. औषधेदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.