शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अक्कलकुवा येथील कालिका माता यात्रेची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला ९ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. १९ फेब्रुवारी १९२० रोजी महाकाली मातेची पहिली यात्रा भरविण्यात आली होती.९ फेब्रुवारीला संध्याकाळी अक्कलकुवा परिसरातील गंगापूर, ठाणाविहीर, खटवानी, जामली, मिठ्याफळी येथील नागरिक सवाद्य तगदरावांची मिरवणूक काढून विधीवत पूजा करतात. त्यानंतर यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेच्या प्रारंभी श्री महाकालिका देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी चिप्टनच्या वारसदारांना दिला जातो. अक्कलकुवा तालुक्यातील काठी चिप्टन इस्टेटचे राजे रणजितसिंग सूरजसिंग पाडवी यांना पुत्रप्राप्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या नावाने पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. देवीच्या नावाने केलेला नवस खरा ठरला व आशीर्वाद स्वरुपात पुत्र प्राप्त झाला. नवसपूर्ती म्हणून १९२० मध्ये राजेंनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या मंदिराचे साध्या पद्धतीने बांधकाम करुन देवीची व महादेवाची पिंड स्थापन करण्यात आली होती. त्याकाळी काठी चिप्टन यांनी देवीची पूजाअर्चा व मंदिराच्या विकासासाठी १२ एकर २७ गुंठे जागा दान केली. १९८२ मध्ये आलेल्या चक्रीवादळात मंदिराशेजारी असलेले भव्य वडाचे झाड कोसळल्याने मंदिराचा गाभा वगळता मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मंदिराच्या विकासाठी १९८६ मध्ये सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मंदिराची विश्वस्त म्हणून नोंद करुन घेण्यात आली. प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे व मधुकर लोहार यांच्या कमिटीने काम पाहिले. मंदिराच्या विश्वस्तांनी नव्याने मंदिर उभारुन २००६ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरासमोर हनुमान व महादेव मंदिर उभारण्यात आले आहे.गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात ही यात्रा भरत असल्याने सातपुड्यातून हजारो गावठी व खिल्लारी जातीचे बैल विक्रीला येतात. बैल बाजारावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते. बैलांच्या खरेदी-विक्रीतून अडीच ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. बैलगाड्यांसह शेतीपयोगी साहित्याचीही विक्री मोठी होते. मनोरंजनासाठी लहान-मोठ्या पालख्या, मौत का कुवा, संसारोपयोगी साहित्य, भांडी, खेळणीची दुकाने, हॉटेल्स, रसवंतीगृहे यासह सुमारे ५०० व्यावसायिक यात्रेत दुकाने थाटतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येथे येतात. ही यात्रा सात दिवस भरते. यात्रेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाडवी, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.