शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

तीन महिने राहणार नवापुरातील पोल्ट्री व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:31 IST

यात सकीस्मा पोल्ट्रीतील १ लाख ७ हजार ७८९ तर जनता पोल्ट्रीमधील २२ हजार ९६५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. ...

यात सकीस्मा पोल्ट्रीतील १ लाख ७ हजार ७८९ तर जनता पोल्ट्रीमधील २२ हजार ९६५ पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. २४ पैकी २२ पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात आले. सहा दिवसात आतापर्यंत ५ लाख १० हजार २१० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट केली, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा वगळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून येत आहे. देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून त्यातील नवापूर हे बर्ड फ्लूचे मुख्य केंद्र बनले आहे. आर्थिक उलाढाल काहीअंशी मंदावली आहे. नवापुरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. यासाठी मोठी यंत्रणा कमाल लागली आहे. पाच ते दहा जेसीबी मशीन, १५ ते २० ट्रॅक्टर, टेम्पो, ॲम्बुलन्स, तसेच कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी चार ते पाच स्कूल बस तसेच ४० ते ५० शासकीय वाहने, नगरपालिकेचे आरोग्य विभागाची वाहतूक यंत्रणा या मोहिमेत सहभागी झालेले आहेत. महसूल पशुसंवर्धन, पोलीस, नगरपालिका पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी बर्ड फ्लू नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. सर्व पोल्ट्रीतील पक्ष्यांचा नाश झाल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त बाबूराव नरवाडे यांनी दिली.

शनिवारी अनेक मोठ्या पोल्ट्रीतील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेली लाखो अंडी नाश करण्यात येणार आहेत. तसेच बर्ड फ्लू ग्रस्त पोल्ट्रीतील लाखो पक्षी नष्ट करण्याचे किलिंग ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. आठवड्याभरातील किलिंग ऑपरेशनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी वसुमना पंत व नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या उत्तम नियोजनामुळे बर्ड फ्लू नियंत्रणाचे काम सुरळीत सुरू आहे. शिश पोल्ट्रीचे मालक यांच्या पोल्ट्रीच्या झालेल्या नुकसानीची माहिती देताना शिश टिमोल भावूक झाले.

तीन महिने पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार

साधारणतः ९० दिवसांपर्यंत नवापुरातील संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय बंद राहणार आहे. त्यादरम्यान एका पोल्ट्रीतील साधारणतः २५ ते ३० असे एकूण हजारो मजुरांचा पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. नवापूर शहरात बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घातल्याने शेकडो छोटे-मोठे व्यावसायिकांवर बेराजगारीचे संकट उभे टाकले आहे. आधीच कोरोनाने हैराण झालेल्या छोट्या व्यापारांना बर्ड फ्लूचे या नवीन आलेल्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.