शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

तोरणमाळ पर्यटनस्थळाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. ...

तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे साहजिकच एक-दोन दिवसांच्या निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक येथे येत असतात. तथापि, गेल्यावर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगातच धुमाकूळ घातला होता. परिणामी शासनाच्या लाॅकडाऊनमुळे पर्यटन स्थळांना फटका बसला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून नये म्हणून पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला लागल्याने शासनाने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. साहजिकच जिल्ह्याबरोबरच जवळील गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील पर्यटक कोरोना काळातील कंटाळवाणा घालवण्यासाठी तोरणमाळ येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावत आहेत. विशेषत: जिल्ह्यातील जे नागरिक, विद्यार्थी परदेशात देशात होते परंतु कोरोनामुळे आपल्या गावात सध्या वास्तव्यास आहेत असे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र येथे आल्यानंतर येथील सर्वच पॉईंटसची अवस्था पहिल्यानंतर मोठे विदारक चित्र दिसून येत असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जवळपास सर्वच ठिकाणी कठडे तुटले आहेत. केव्हा खाईत तोल जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ते पॉईंट अत्यंत धोकादायक ठरले आहेत. अंतर्गत रस्त्यांचीदेखील अक्षरशः चाळण झाली आहे. पुलाचीही दुरवस्था झाली आहे. वास्तविक या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा वाव आहे. कारण महाबळेश्वर, माथेराननंतर तोरणमाळच उंच स्थानावर आहे. शिवाय गुजरात, मध्य प्रदेशमधील पर्यटकांना जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. परंतु विकासाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी उदासीन भूमिका घेतल्याने विकासापासून कोसो दूर आहे.

बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती करपल्या

वनविभागाने वनौषधींसाठी जतन केलेल्या बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती पाण्याअभावी करपत आहेत. तेथील रस्त्यावरील फरशादेखील पूर्णत: उखडल्या आहेत. स्वच्छताही केली जात नाही. एकेकाळी घनदाट जंगलांनी वेढलेला तोरणमाळ आता भकास दिसत असल्याची व्यथा काही पर्यटकांनी बोलून दाखवली आहे. इतर पॉईंटसचीही दुरवस्था झाली आहे. सीताखाई व इतर खोल दरीच्या ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटल्याने ते धोकादायक बनले आहे.

कोरोना महामारीमुळे गावाकडे आली होती. शासनाने पर्यटनस्थळे खुली केल्यामुळे एका दिवसाच्या पर्यटनासाठी तोरणमाळ येथे आली होती. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नाव ऐकले आहे. साहजिकच चांगल्या सुविधा असतील अशी भावना होती. परंतु येथे आल्यानंतर येथील सुविधांचे विदारक चित्र दिसून आले. सर्वच पॉईंटची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने विकासाबाबत लक्ष घातले पाहिजे.

-धनश्री पाटील, पर्यटक, खारघर (मुंबई)