लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ सध्या धुक्यात हरवले आहे़ तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील रस्त्यांवर ढग उतरुन आल्याने धुके वाढत आहे़एकीकडे निसर्ग सौंदर्य बहरत असताना पर्यटकांना मात्र त्याचा आनंद पाहता येणार नाही़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोरणमाळ पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात आले आहे़ दरम्यान दोन दिवसांपूर्वी आणखी एक रुग्ण आढळून आल्याने भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोरक्षनाथ मंदिरातील दर्शनही बंद ठेवण्यात आले आहे़ पावसामुळ सिताखाई धबधब्याच्या पाण्यात वाढ होत आहे़ सोबत डोंगरदºयातील इतर धबधबेही प्रवाहित झाले आहेत़ तोरणमाळकडे जाताना दाट धुके आणि त्यात हरवलेला रस्ता असा प्रवास करणे चैतन्यदायी असल्याने अनेकांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता़ परंतु राणीपूर येथूनच पर्यटकांना परत पाठवण्यात आल्याची माहिती आहे़ येत्या काही दिवसात तोरणमाळ येथील व्यवहार सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ तोरणमाळ गाव बंद असले तरी लेंगापाणी, कालापाणी या परिसरात पायी भटकंती शक्य आहे. यातून अनेक जण राणीपूर येथे मोटारसायकली लावून पावसाचा आनंद घेत फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ हरवले धुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:24 IST