करता जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी-विक्री व्यवहारास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी, मका,
हरभरा, मिरची, भाजीपाला (नाशवंत) खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समिती पहाटे ५ ते ११ या
कालावधीत सुरू ठेवण्यात याव्यात, सकाळी ११ नंतर कुठलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, शेतीविषयक दुकाने, बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीविषयक अवजारे, पशुखाद्य, कृषी साहित्याची दुरुस्ती, विक्री आदी आस्थापना सकाळी सात ते ११ या कालावधीत सुरू राहतील.
जिल्हा सीमा, जिल्ह्यातील चेकपोस्टवर शेतीसंबंधित धान्य माल विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीतून सूट राहील. शेती मालाबाबत कुणीही अफवा पसरवून शेतक-यांची फसवणूक, अडवणूक करताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळवले आहे.