शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सानेगुरुजींच्या पत्रांतील व्यक्तिरेखा सहा दशकांनीही भेटतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:43 IST

सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो

- रमाकांत पाटीलनंदुरबार : सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया सानेगुरुजींची पुतणी सुधाताई बोडा यांनी ‘लोकमत’कडे दिली. गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाला गती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जून १९४९ ते जून १९५० या वर्षभराच्या काळात प्रत्येक आठवड्याला एक अशी पत्रे सानेगुरुजींनी आपली पुतणी सुधाला लिहिली होती. सध्या सुधा बडोदा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली असून, एक व्रतस्थ जीवन त्या जगत आहेत.‘मी १३ वर्षांची असतानाच अण्णा गेले. तत्पूर्वी ते भूमिगत व कारावासातच होते. १९४८ ते १९५० या काळात त्यांचा काही काळ सहवास लाभला. मात्र, याही काळात त्यांच्या जेवढा काळ ते घरी असायचे, त्या काळातही घरी होणाºया बैठका, नियोजन, भेटीसाठी येणाºयांचा राबता, यामुळे खूप कमी त्यांच्याशी संवाद साधता आले, पण त्यांची पत्रे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा राहिला. या पत्रात त्या-त्या काळाचे अनेकांचे संदर्भही आहेत,’ असे सुधाताई यांनी सांगितले.गेल्याच वर्षी आपण कर्नाटकातील गदगला गेलो होतो. गुरुजींनी १० जून १९५० ला शेवटचे पत्र लिहिले होते. त्यात गदग, धारवड, हुबळीबाबत लिहिले होते. तेथे गेल्यानंतर गुरुजींनी ज्या डॉ. अण्णासाहेब चाफेकरांबद्दल लिहीले होते, त्यांच्या घरी आपण गेलो. त्याच गावातील ज्या मंदिराचे वर्णन गुरुजींनी केले होते त्या मंदिरातील पुजाºयाला भेटता आले. अशा कितीतरी व्यक्तीरेखा पुन्हा भेटतात, असेही त्या म्हणाल्या.‘श्यामची आई’ जपानी भाषेतहीमाझ्या नातीची मैत्रीण बंगळुरू येथे शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत जपानी मुलगी शिक्षण घेत होती. जपानच्या शिक्षिका शोकोनाका गावा यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक जापानी भाषेत छापून जपानमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे पुस्तक जपानच्या अनेक कुटुंबांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अशा बाबी जेव्हा आपल्याला कळतात, तेव्हा खरोखरच मनाला खूप खूप आनंद होतो, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र