शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

सानेगुरुजींच्या पत्रांतील व्यक्तिरेखा सहा दशकांनीही भेटतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 06:43 IST

सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो

- रमाकांत पाटीलनंदुरबार : सानेगुरुजींनी अर्थात अण्णांनी लिहिलेली पत्रे हा माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहेत. या पत्रांतील व्यक्तिरेखा आज सहा दशकांनंतरही भेटतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तो पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळतो, अशी प्रतिक्रिया सानेगुरुजींची पुतणी सुधाताई बोडा यांनी ‘लोकमत’कडे दिली. गुरुजींच्या आंतरभारतीच्या स्वप्नाला गती मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.जून १९४९ ते जून १९५० या वर्षभराच्या काळात प्रत्येक आठवड्याला एक अशी पत्रे सानेगुरुजींनी आपली पुतणी सुधाला लिहिली होती. सध्या सुधा बडोदा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी वयाची ८५ वर्षे पूर्ण केली असून, एक व्रतस्थ जीवन त्या जगत आहेत.‘मी १३ वर्षांची असतानाच अण्णा गेले. तत्पूर्वी ते भूमिगत व कारावासातच होते. १९४८ ते १९५० या काळात त्यांचा काही काळ सहवास लाभला. मात्र, याही काळात त्यांच्या जेवढा काळ ते घरी असायचे, त्या काळातही घरी होणाºया बैठका, नियोजन, भेटीसाठी येणाºयांचा राबता, यामुळे खूप कमी त्यांच्याशी संवाद साधता आले, पण त्यांची पत्रे आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा राहिला. या पत्रात त्या-त्या काळाचे अनेकांचे संदर्भही आहेत,’ असे सुधाताई यांनी सांगितले.गेल्याच वर्षी आपण कर्नाटकातील गदगला गेलो होतो. गुरुजींनी १० जून १९५० ला शेवटचे पत्र लिहिले होते. त्यात गदग, धारवड, हुबळीबाबत लिहिले होते. तेथे गेल्यानंतर गुरुजींनी ज्या डॉ. अण्णासाहेब चाफेकरांबद्दल लिहीले होते, त्यांच्या घरी आपण गेलो. त्याच गावातील ज्या मंदिराचे वर्णन गुरुजींनी केले होते त्या मंदिरातील पुजाºयाला भेटता आले. अशा कितीतरी व्यक्तीरेखा पुन्हा भेटतात, असेही त्या म्हणाल्या.‘श्यामची आई’ जपानी भाषेतहीमाझ्या नातीची मैत्रीण बंगळुरू येथे शिक्षण घेत आहे. तिच्या शाळेत जपानी मुलगी शिक्षण घेत होती. जपानच्या शिक्षिका शोकोनाका गावा यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक जापानी भाषेत छापून जपानमध्ये लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे पुस्तक जपानच्या अनेक कुटुंबांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम करीत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अशा बाबी जेव्हा आपल्याला कळतात, तेव्हा खरोखरच मनाला खूप खूप आनंद होतो, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र