शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लोक शिरले जंगलात अन् बिबटय़ा आला गावात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:06 IST

जिल्ह्यात चिंतेचा विषय : वनविभागाच्या निष्काळजीपणाचे फलीत

-रमाकांत पाटीलजिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. विशेषत: उसाच्या शेतात या बिबटय़ांचे वास्तव्य वाढल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांची           डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी करणा:या एका मजुराच्या मुलाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जनमानसात अधिकच संतप्त वातावरण आहे. एकूणच जिल्ह्यातील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत असून वनविभाग व प्रशासनाचे लाखोंच्या वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच रंगवले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून आता सर्वानीच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात जंगल क्षेत्राच्या बाबतीत आघाडीचा जिल्हा. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार 961 स्क्वे. किलोमीटर असून त्यापैकी दोन हजार 392 स्क्वे. किलोमीटर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. अर्थातच जिल्ह्याचे एकूण जंगल क्षेत्र 44 टक्के आहे. त्यातही सातपुडय़ाचे जंगल हे राज्यात एकेकाळी प्रसिद्ध जंगल मानले जायचे. सागाचे जंगल म्हणून त्याची ख्याती होती. परंतु रेल्वे मार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतरपासून तर 80 च्या दशकार्पयत जंगल तोडीबाबत शासनाचेही उदासीन धोरण होते. ‘मोळी विकू पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य शासनानेच तयार करून एकप्रकारे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले होते. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 33 गावे व त्या भागातील जंगल बुडाल्याने त्यातही मोठी जंगलाची हानी झाली. त्याची भरपाई म्हणून 55 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. अलिकडच्या काळातदेखील 11 कोटी, 22 कोटी, 33 कोटी, 55 कोटी अशा वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात            लाखो रोपांची लागवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र आज जंगल शोधूनही सापडेना, अशी अवस्था आहे. सातपुडय़ाची टेकडी पूर्णपणे बोडकी आहे. या भागात सावलीसाठीही झाड शोधावे लागते. जंगलच नष्ट होत असल्याने त्याचे अनेक परिणाम सध्या जिल्हा सोसत आहे.या पाश्र्वभूमीवर सध्या उद्भवलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचे वास्तव्य गावाकडे व शेताकडे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबटय़ा दिसतो. काही ठिकाणी शेळ्या-मेंढय़ा, गाय, बैल, घोडे तो फस्त करीत असतो. या घटनांमुळे त्या त्या गावात भीतीचे वातावरण पसरते. सध्या उसाच्या शेतांमध्ये बिबटय़ांचे वास्तव्य अधिक दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उसाच्या शेतातून हा बिबटय़ा बाहेर काढणे कठीण असल्याने कारखाना आणि शेतक:यांच्या संगनमताने ऊस तोडणीसाठी उसाच्या शेतालाच आग लावावी लागत असल्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. यामुळे जळालेल्या उसामुळे वजन कमी होत असल्याने त्याचा शेतक:यालाही व तसा ऊस कारखान्यांना गाळप करावा लागत असल्याने कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर या बिबटय़ांमुळे ऊस तोडणारे मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसापूर्वीच इस्लामपूर, ता.शहादा शिवारात ऊस तोड सुरू असताना एका मजुराच्या आठ वर्षाच्या मुलालाच बिबटय़ाने लक्ष्य केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिबटय़ांचे ग्रामीण भागातील वास्तव्याच्या व त्यामुळे जनजीवन भयभीत झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतानाही वनविभाग आणि प्रशासनाने           अजूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा विषय अधिकच चिंताजनक झाला आहे. या घटना रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील जंगल प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी व राखण्यासाठी आता सर्वानीच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वनविभागाने त्याची उच्चस्तरावर चौकशी करून आजवर लावलेल्या झाडांचे ऑडिट करून त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.