शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

लोक शिरले जंगलात अन् बिबटय़ा आला गावात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:06 IST

जिल्ह्यात चिंतेचा विषय : वनविभागाच्या निष्काळजीपणाचे फलीत

-रमाकांत पाटीलजिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. विशेषत: उसाच्या शेतात या बिबटय़ांचे वास्तव्य वाढल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांची           डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी करणा:या एका मजुराच्या मुलाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जनमानसात अधिकच संतप्त वातावरण आहे. एकूणच जिल्ह्यातील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत असून वनविभाग व प्रशासनाचे लाखोंच्या वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच रंगवले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून आता सर्वानीच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात जंगल क्षेत्राच्या बाबतीत आघाडीचा जिल्हा. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार 961 स्क्वे. किलोमीटर असून त्यापैकी दोन हजार 392 स्क्वे. किलोमीटर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. अर्थातच जिल्ह्याचे एकूण जंगल क्षेत्र 44 टक्के आहे. त्यातही सातपुडय़ाचे जंगल हे राज्यात एकेकाळी प्रसिद्ध जंगल मानले जायचे. सागाचे जंगल म्हणून त्याची ख्याती होती. परंतु रेल्वे मार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतरपासून तर 80 च्या दशकार्पयत जंगल तोडीबाबत शासनाचेही उदासीन धोरण होते. ‘मोळी विकू पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य शासनानेच तयार करून एकप्रकारे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले होते. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 33 गावे व त्या भागातील जंगल बुडाल्याने त्यातही मोठी जंगलाची हानी झाली. त्याची भरपाई म्हणून 55 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. अलिकडच्या काळातदेखील 11 कोटी, 22 कोटी, 33 कोटी, 55 कोटी अशा वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात            लाखो रोपांची लागवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र आज जंगल शोधूनही सापडेना, अशी अवस्था आहे. सातपुडय़ाची टेकडी पूर्णपणे बोडकी आहे. या भागात सावलीसाठीही झाड शोधावे लागते. जंगलच नष्ट होत असल्याने त्याचे अनेक परिणाम सध्या जिल्हा सोसत आहे.या पाश्र्वभूमीवर सध्या उद्भवलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचे वास्तव्य गावाकडे व शेताकडे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबटय़ा दिसतो. काही ठिकाणी शेळ्या-मेंढय़ा, गाय, बैल, घोडे तो फस्त करीत असतो. या घटनांमुळे त्या त्या गावात भीतीचे वातावरण पसरते. सध्या उसाच्या शेतांमध्ये बिबटय़ांचे वास्तव्य अधिक दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उसाच्या शेतातून हा बिबटय़ा बाहेर काढणे कठीण असल्याने कारखाना आणि शेतक:यांच्या संगनमताने ऊस तोडणीसाठी उसाच्या शेतालाच आग लावावी लागत असल्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. यामुळे जळालेल्या उसामुळे वजन कमी होत असल्याने त्याचा शेतक:यालाही व तसा ऊस कारखान्यांना गाळप करावा लागत असल्याने कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर या बिबटय़ांमुळे ऊस तोडणारे मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसापूर्वीच इस्लामपूर, ता.शहादा शिवारात ऊस तोड सुरू असताना एका मजुराच्या आठ वर्षाच्या मुलालाच बिबटय़ाने लक्ष्य केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिबटय़ांचे ग्रामीण भागातील वास्तव्याच्या व त्यामुळे जनजीवन भयभीत झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतानाही वनविभाग आणि प्रशासनाने           अजूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा विषय अधिकच चिंताजनक झाला आहे. या घटना रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील जंगल प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी व राखण्यासाठी आता सर्वानीच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वनविभागाने त्याची उच्चस्तरावर चौकशी करून आजवर लावलेल्या झाडांचे ऑडिट करून त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.