शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

लोक शिरले जंगलात अन् बिबटय़ा आला गावात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:06 IST

जिल्ह्यात चिंतेचा विषय : वनविभागाच्या निष्काळजीपणाचे फलीत

-रमाकांत पाटीलजिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. विशेषत: उसाच्या शेतात या बिबटय़ांचे वास्तव्य वाढल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांची           डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी करणा:या एका मजुराच्या मुलाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जनमानसात अधिकच संतप्त वातावरण आहे. एकूणच जिल्ह्यातील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत असून वनविभाग व प्रशासनाचे लाखोंच्या वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच रंगवले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून आता सर्वानीच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात जंगल क्षेत्राच्या बाबतीत आघाडीचा जिल्हा. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार 961 स्क्वे. किलोमीटर असून त्यापैकी दोन हजार 392 स्क्वे. किलोमीटर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. अर्थातच जिल्ह्याचे एकूण जंगल क्षेत्र 44 टक्के आहे. त्यातही सातपुडय़ाचे जंगल हे राज्यात एकेकाळी प्रसिद्ध जंगल मानले जायचे. सागाचे जंगल म्हणून त्याची ख्याती होती. परंतु रेल्वे मार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतरपासून तर 80 च्या दशकार्पयत जंगल तोडीबाबत शासनाचेही उदासीन धोरण होते. ‘मोळी विकू पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य शासनानेच तयार करून एकप्रकारे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले होते. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 33 गावे व त्या भागातील जंगल बुडाल्याने त्यातही मोठी जंगलाची हानी झाली. त्याची भरपाई म्हणून 55 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. अलिकडच्या काळातदेखील 11 कोटी, 22 कोटी, 33 कोटी, 55 कोटी अशा वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात            लाखो रोपांची लागवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र आज जंगल शोधूनही सापडेना, अशी अवस्था आहे. सातपुडय़ाची टेकडी पूर्णपणे बोडकी आहे. या भागात सावलीसाठीही झाड शोधावे लागते. जंगलच नष्ट होत असल्याने त्याचे अनेक परिणाम सध्या जिल्हा सोसत आहे.या पाश्र्वभूमीवर सध्या उद्भवलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचे वास्तव्य गावाकडे व शेताकडे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबटय़ा दिसतो. काही ठिकाणी शेळ्या-मेंढय़ा, गाय, बैल, घोडे तो फस्त करीत असतो. या घटनांमुळे त्या त्या गावात भीतीचे वातावरण पसरते. सध्या उसाच्या शेतांमध्ये बिबटय़ांचे वास्तव्य अधिक दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उसाच्या शेतातून हा बिबटय़ा बाहेर काढणे कठीण असल्याने कारखाना आणि शेतक:यांच्या संगनमताने ऊस तोडणीसाठी उसाच्या शेतालाच आग लावावी लागत असल्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. यामुळे जळालेल्या उसामुळे वजन कमी होत असल्याने त्याचा शेतक:यालाही व तसा ऊस कारखान्यांना गाळप करावा लागत असल्याने कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर या बिबटय़ांमुळे ऊस तोडणारे मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसापूर्वीच इस्लामपूर, ता.शहादा शिवारात ऊस तोड सुरू असताना एका मजुराच्या आठ वर्षाच्या मुलालाच बिबटय़ाने लक्ष्य केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिबटय़ांचे ग्रामीण भागातील वास्तव्याच्या व त्यामुळे जनजीवन भयभीत झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतानाही वनविभाग आणि प्रशासनाने           अजूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा विषय अधिकच चिंताजनक झाला आहे. या घटना रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील जंगल प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी व राखण्यासाठी आता सर्वानीच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वनविभागाने त्याची उच्चस्तरावर चौकशी करून आजवर लावलेल्या झाडांचे ऑडिट करून त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.