शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लोक शिरले जंगलात अन् बिबटय़ा आला गावात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:06 IST

जिल्ह्यात चिंतेचा विषय : वनविभागाच्या निष्काळजीपणाचे फलीत

-रमाकांत पाटीलजिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात बिबटय़ांचा धुमाकूळ सुरू झाला असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. विशेषत: उसाच्या शेतात या बिबटय़ांचे वास्तव्य वाढल्याने ऊस तोडणीसाठी शेतकरी आणि साखर कारखान्यांची           डोकेदुखी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऊस तोडणी करणा:या एका मजुराच्या मुलाचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने जनमानसात अधिकच संतप्त वातावरण आहे. एकूणच जिल्ह्यातील जंगल दिवसेंदिवस नष्ट होत असून वनविभाग व प्रशासनाचे लाखोंच्या वृक्ष लागवडीचे आकडे केवळ कागदावरच रंगवले जात असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून आता सर्वानीच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.नंदुरबार जिल्हा तसा राज्यात जंगल क्षेत्राच्या बाबतीत आघाडीचा जिल्हा. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पाच हजार 961 स्क्वे. किलोमीटर असून त्यापैकी दोन हजार 392 स्क्वे. किलोमीटर क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. अर्थातच जिल्ह्याचे एकूण जंगल क्षेत्र 44 टक्के आहे. त्यातही सातपुडय़ाचे जंगल हे राज्यात एकेकाळी प्रसिद्ध जंगल मानले जायचे. सागाचे जंगल म्हणून त्याची ख्याती होती. परंतु रेल्वे मार्गासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड झाली. त्यानंतर पुढे स्वातंत्र्यानंतरपासून तर 80 च्या दशकार्पयत जंगल तोडीबाबत शासनाचेही उदासीन धोरण होते. ‘मोळी विकू पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य शासनानेच तयार करून एकप्रकारे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले होते. सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात 33 गावे व त्या भागातील जंगल बुडाल्याने त्यातही मोठी जंगलाची हानी झाली. त्याची भरपाई म्हणून 55 लाख वृक्ष लागवड करण्यात आले. अलिकडच्या काळातदेखील 11 कोटी, 22 कोटी, 33 कोटी, 55 कोटी अशा वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात            लाखो रोपांची लागवड करण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र आज जंगल शोधूनही सापडेना, अशी अवस्था आहे. सातपुडय़ाची टेकडी पूर्णपणे बोडकी आहे. या भागात सावलीसाठीही झाड शोधावे लागते. जंगलच नष्ट होत असल्याने त्याचे अनेक परिणाम सध्या जिल्हा सोसत आहे.या पाश्र्वभूमीवर सध्या उद्भवलेली सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर बिबटय़ांचे वास्तव्य गावाकडे व शेताकडे झाले आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात बिबटय़ा दिसतो. काही ठिकाणी शेळ्या-मेंढय़ा, गाय, बैल, घोडे तो फस्त करीत असतो. या घटनांमुळे त्या त्या गावात भीतीचे वातावरण पसरते. सध्या उसाच्या शेतांमध्ये बिबटय़ांचे वास्तव्य अधिक दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊसतोडही मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. पण ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उसाच्या शेतातून हा बिबटय़ा बाहेर काढणे कठीण असल्याने कारखाना आणि शेतक:यांच्या संगनमताने ऊस तोडणीसाठी उसाच्या शेतालाच आग लावावी लागत असल्याच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. यामुळे जळालेल्या उसामुळे वजन कमी होत असल्याने त्याचा शेतक:यालाही व तसा ऊस कारखान्यांना गाळप करावा लागत असल्याने कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही ठिकाणी तर या बिबटय़ांमुळे ऊस तोडणारे मजूर जखमी झाल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसापूर्वीच इस्लामपूर, ता.शहादा शिवारात ऊस तोड सुरू असताना एका मजुराच्या आठ वर्षाच्या मुलालाच बिबटय़ाने लक्ष्य केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.एकूणच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिबटय़ांचे ग्रामीण भागातील वास्तव्याच्या व त्यामुळे जनजीवन भयभीत झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतानाही वनविभाग आणि प्रशासनाने           अजूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे एकूणच हा विषय अधिकच चिंताजनक झाला आहे. या घटना रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील जंगल प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी व राखण्यासाठी आता सर्वानीच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वनविभागाने त्याची उच्चस्तरावर चौकशी करून आजवर लावलेल्या झाडांचे ऑडिट करून त्यावर चिंतन करण्याची गरज आहे.