शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
3
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
5
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
6
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
7
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
8
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
9
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
10
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
11
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
12
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
13
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
14
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
15
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
16
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
17
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
18
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
19
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
20
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

शैक्षणिक इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पासच्या निर्णयाबाबत पालकांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST

निर्णयाबाबत पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्यच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण एक प्रकारे बंदच होते. अधून मधून ...

निर्णयाबाबत पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्यच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण एक प्रकारे बंदच होते. अधून मधून शिक्षक येऊन गृहपाठ देऊन शिक्षण सुरू ठेवले. अशात परीक्षा जरी झाल्या असत्या तरी विद्यार्थ्यांना पासच केले असते. आता फक्त त्याची अधिकृत घोषण झाल्यासारखे झाले. कोरोनामुळे परीक्षा घेणं शक्यच नाही. ग्रामीण व दुर्गम भाग असूनदेखील आता मुलांची काळजी वाटते. परीक्षा न घेण्याचा निर्णय चांगला आहे. -रमेश पाडवी, पालक, कोठार

पाल्यांना परीक्षेला पाठविले नसते...

सध्या सर्व क्षेत्रांची परिस्थिती बिकट झाली आहेत, शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद ठरले नसून आज कोरानाची वाढते रुग्णसंख्या बघता परीक्षा घेणे शक्य नाही. जरी सरकारने परीक्षा घेतली असती तरी आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत परीक्षेला पाठविले नसते. दरवर्षीदेखील परीक्षा घेऊन मुलांना नापास तर केले जात नाही, फक्त परीक्षा व निकालाचे सोयरसुतक राहणार नाही.

-भूषण पवार, पालक, तळोदा

किमान परीक्षेची तयारी पाहीजे होती...

आजच्या स्थितीला जरी शासनाचे निर्णय योग्य वाटत असला तरी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने यासंबंधी तयारी करायला पाहिजे होती. परीक्षेसाठी विशिष्ट प्रकारच्या बाबींची व्यवस्था करणे गरजेचे होते, जेणेकरून विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन करता येणे शक्य झाले असते व विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात परीक्षा देऊन पास झाल्याचे समाधान राहिले असते.

-अमर पाटील, पालक, तळोदा

परीक्षेमुळे शिक्षणाप्रती जाणीव झाली असती...

शासनाचा यावर्षी परीक्षाच न घेण्याचा निर्णय आश्चर्यकारक वाटला, कारण ऑनलाइनच्या युगात उपलब्ध कोणत्या ना कोणत्या मार्गाने परीक्षा औपचारिकता म्हणून का होईना घेणे आवश्यक होते. त्याद्वारे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याचे विद्यार्थी व पालक यांना समजले असते. परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती जाणीव निर्माण झाली असती.

-अल्ताफ पिंजारी, पालक, तळोदा

शैक्षणिक दृष्टीने निर्णय चिंताजनक आहे

प्रत्यक्ष शाळेत शिकविणे व ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेणे यात मोठी तफावत आहे. नेटवर्क प्रॉब्लेम व सातत्याने मोबाइलचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मोकळेपणाने शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा रद्द केल्यामुळे शासनाची ही भूमिका चांगली असली, तरी शैक्षणिक दृष्टीने चिंताजनक आहे

-सोनाली लोकरे, गृहिणी, शहादा

शैक्षणिक विकासासाठी विविध उपाययोजना राबविल्या पाहिजे

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण घेता आले नाही, त्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले ते तोकडेच होते. त्यात परीक्षा न होणे यामुळे मुले अभ्यास करणार नाही आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने त्यांची परीक्षा घेण्याऐवजी त्यांना सरसकट पास केले असले, तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी वेगळ्या उपायोजना राबविल्या पाहिजे.

-अमिता अशोक आहिरे, गृहिणी, शहादा