शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीवर ओपन मार्केटचा वार; तरीही सीसीआय दोन लाखांच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

२०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरू होती. यातून शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ...

२०१९ च्या खरीप हंगामातील कापूस खरेदी जून २०२० पर्यंत सुरू होती. यातून शेतकऱ्यांनी गेल्या खरीप हंगामातही पुन्हा कापसावर भिस्त ठेवत १ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड केली होती. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन येणार अशी शक्यता असताना कापसावर लाल्याचे आक्रमण झाले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी हाती असलेला कापूस वेचणी करत सीसीआयकडे नोंदणी केली होती. नंदुरबार तालुक्यात साधारण साडेसात हजार तर शहादा तालुक्यात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करून कापूस विक्री केली होती. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या या खरेदीला वेळोवेळी ब्रेक लागूनही जानेवारीच्या मध्यातच शहादा आणि नंदुरबार केंद्रांनी अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण केली आहे.

दरम्यान, खासगी व्यापारी सीसीआय देत असलेल्या ५ हजार ७०० ते ५ हजार ८०० रुपयांपर्यंतचे दर देत असतानाही गेल्या काही वर्षांत खेडा खरेदीत झालेल्या फसवणुकीमुळे शेतकरी सीसीआयकडेच कापूस देत आहेत. यातून केवळ अडीच महिन्यांच्या काळात ही खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नंदुरबार येथील केंद्रावर गेल्या दोन दिवसांपूर्वीच एक क्विंटल कापूस खरेदीचा टप्पा पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने शेतकरी या ठिकाणी धाव घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. शहादा तालुक्यात मात्र याउलट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना संपर्क करत खेडा खरेदी करणारे थेट घरापर्यंत जाऊन मालाची उचल करू लागल्याने शहादा तालुक्यातील कापूस खरेदीचा हंगाम आवरता झाल्याचे बोलले जात आहे. यातच खेतिया बाजारातही कापसाचे दर वाढले असल्याने शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तिकडची वाट धरली आहे.

नंदुरबार एक लाख पार

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रात एक लाख २०० क्विंटल कापूस आवक आजअखेरीस झाली आहे.

या केंद्रात ५ हजार ८६० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी केला गेला.

नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातून येथे कापसाची आवक झाली होती.

शहाद्यात आवक थंड

शहादा बाजार समिती सीसीआयचे केंद्र चालवते. या ठिकाणी आतापर्यंत १ लाख ५८ हजार क्विंटल कापूस आवक झाली आहे.

परंतु, तूर्तास आवक थांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यात खासगी व्यापारी ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर देत असल्याने ही स्थिती आहे.