शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

लॉकडाऊन काळात फक्त सहाच नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा होती़ मात्र गेल्या तीन महिन्यात विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे केवळ ६ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले असल्याची माहिती समोर आली आहे़जिल्ह्यासाठी सहायक दुय्यम निंबधक वर्ग-१ या कार्यालयात विशेष विवाह अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांना नोंदणी पद्धतीने विवाह करुन देत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ १९५४ च्या विशेष विवाह कायद्यानुसार येथे नोंदणी विवाहाचे कामकाज सुरू आहे़ परंतु लॉकडाऊनमुळे एक महिना हे कार्यालय बंद असल्याने ज्यांनी नोंदण्या करुन ठेवल्या होत्या़ त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता़ जिल्ह्यातून सहाच जणांनी नोंदणी विवाह केल्याने आजही जिल्ह्यात याबाबत उदासिनता असल्याचे स्पष्ट होत आहे़ संबधित कार्यालयाकडून तातडीने प्रमाणपत्र देऊन शासनदरबारी तशी तातडीची नोंद करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़एकीकडे नोंदणी विवाहांबाबत उदासिनता असताना दुसरीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरणही लॉकडाऊनमुळे संथ झाले होते़ या कामांनाही आता गती देण्यात येत असून नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावर कामकाज सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांना निबंधकाचा दर्जा देऊन त्यांच्याकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्ममृत्यू दाखले देण्याची तरतूद आहे़ तर नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांच्या आदेशाने दाखले दिले जातात़ सलग तीन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसह जन्ममृत्यू दाखले मिळण्यास अडचणी येत होत्या़ मात्र मिशन बिगीन अंतर्गत दाखले वितरणासाठी पालिका, नगर आणि ग्रामपंचायत यांनी मागील रखडलेले दाखले वितरण करण्यास सुरूवात केली आहे़ जिल्हाभरात गेल्या एक महिन्यात तीन हजाराच्या जवळपास जन्मृमृत्यूचे दाखले दिले गेल्याची माहिती आहे़नंदुरबार नगरपालिकेकडून गेल्या तीन महिन्यात २२ जणांच्या विवाह नोंदण्या करुन प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे़ विवाह झालेल्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर हे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़एकीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जात असताना दुसरीकडे लॉकडाऊन काळात घरगुती कार्यक्रम म्हणून झालेल्या विवाह सोहळ्यांसाठी पत्रिका छापली गेली नसल्याने विवाह नोंदणीसाठी पुरावा म्हणून काय द्यावे अशा विवंचनेत विवाह करणारे असल्याचे चित्र आहे़