शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात फक्त सहाच नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे थाटामाटात होणारे विवाह सोहळे थांबल्याने नोंदणी विवाहाला महत्त्व येईल अशी अपेक्षा होती़ मात्र गेल्या तीन महिन्यात विवाह नोंदणी अधिकारी यांच्याकडे केवळ ६ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले असल्याची माहिती समोर आली आहे़जिल्ह्यासाठी सहायक दुय्यम निंबधक वर्ग-१ या कार्यालयात विशेष विवाह अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांना नोंदणी पद्धतीने विवाह करुन देत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ १९५४ च्या विशेष विवाह कायद्यानुसार येथे नोंदणी विवाहाचे कामकाज सुरू आहे़ परंतु लॉकडाऊनमुळे एक महिना हे कार्यालय बंद असल्याने ज्यांनी नोंदण्या करुन ठेवल्या होत्या़ त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला होता़ जिल्ह्यातून सहाच जणांनी नोंदणी विवाह केल्याने आजही जिल्ह्यात याबाबत उदासिनता असल्याचे स्पष्ट होत आहे़ संबधित कार्यालयाकडून तातडीने प्रमाणपत्र देऊन शासनदरबारी तशी तातडीची नोंद करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़एकीकडे नोंदणी विवाहांबाबत उदासिनता असताना दुसरीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरणही लॉकडाऊनमुळे संथ झाले होते़ या कामांनाही आता गती देण्यात येत असून नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावर कामकाज सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांना निबंधकाचा दर्जा देऊन त्यांच्याकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्ममृत्यू दाखले देण्याची तरतूद आहे़ तर नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांच्या आदेशाने दाखले दिले जातात़ सलग तीन महिने सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विवाह नोंदणी प्रमाणपत्रांसह जन्ममृत्यू दाखले मिळण्यास अडचणी येत होत्या़ मात्र मिशन बिगीन अंतर्गत दाखले वितरणासाठी पालिका, नगर आणि ग्रामपंचायत यांनी मागील रखडलेले दाखले वितरण करण्यास सुरूवात केली आहे़ जिल्हाभरात गेल्या एक महिन्यात तीन हजाराच्या जवळपास जन्मृमृत्यूचे दाखले दिले गेल्याची माहिती आहे़नंदुरबार नगरपालिकेकडून गेल्या तीन महिन्यात २२ जणांच्या विवाह नोंदण्या करुन प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे़ विवाह झालेल्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर हे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे़एकीकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जात असताना दुसरीकडे लॉकडाऊन काळात घरगुती कार्यक्रम म्हणून झालेल्या विवाह सोहळ्यांसाठी पत्रिका छापली गेली नसल्याने विवाह नोंदणीसाठी पुरावा म्हणून काय द्यावे अशा विवंचनेत विवाह करणारे असल्याचे चित्र आहे़