पुढील खरीप हंगामात स्व-उत्पादित सोयाबीनचीच लागवड होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:15+5:302021-01-17T04:27:15+5:30

सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर ...

Only self-produced soybeans will be planted in the next kharif season | पुढील खरीप हंगामात स्व-उत्पादित सोयाबीनचीच लागवड होणार

पुढील खरीप हंगामात स्व-उत्पादित सोयाबीनचीच लागवड होणार

googlenewsNext

सोयाबीन हे स्वपरागसिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्यांच्या उत्पादनातून होणारे सोयाबीन बियाणे दोन वर्षांपर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. शास्रीयदृष्ट्या असे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्यक्षिके योजनांतर्गत शेतकरी समूह यांच्यांकडून आलेल्या उत्पन्नातून बियाणांची चाळणी करून चांगल्या प्रतीच्या बियाणांची निवड करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्यांची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाणांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक गोण्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणांची आदळआपट होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रतिहेक्टरी बियाणे दर ७६ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता ७०टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावेत. सोयाबीनची पेरणी ७५ ते १०० मि.मि.पाऊस झाल्यानंतरच करावी. बियाणांची पेरणी ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.

रायझोबियम व पीएसबी या जीवाणू संवर्धकांची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाणांस पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावी व नंतर त्याची पेरणी पुढील हंगामात करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक किंवा कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे विभागाने आवाहन केले आहे.

Web Title: Only self-produced soybeans will be planted in the next kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.