शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जिल्ह्यात दीड हजार अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वी निर्माण होणार जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यांमध्ये महिला आणि बालविकास विभागाचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यालये तयार करण्यात ...

सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यांमध्ये महिला आणि बालविकास विभागाचे काम सोपे व्हावे यासाठी जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यालये तयार करण्यात आली आहेत. यांतर्गत २ हजार ४४० अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमधून दैनंदिन पोषण आहार देण्यासह विविध प्रकारच्या पोषण योजनाही राबवण्यात येतात. दैनंदिन पोषण आहार मिळत असल्याने लहान बालकेही याठिकाणी सकाळी न चुकता हजेरी लावत आहेत. दिवसेंदिवस अंगणवाड्यांचे काम सुधारत असले तरीही समस्यांचा ससेमिरा काही सुटत नसल्याचे समोर आले आहे आहे. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सहा प्रकल्पातील अंगणवाड्यांमध्ये मोजक्याच ठिकाणी नळ कनेक्शन उपलब्ध असल्याचे दिसून आले आहे. तब्बल दीड हजार ठिकाणी नळच नसल्याने महिला सेविका व मदतनीस यांना पिण्याचे पाणी आणि अन्न शिजवण्यासाठी बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. नर्मदा काठावरील अंगणवाड्यांसाठी डोंगर उतरुन पाणी आणावे लागण्याची कसरत करावे लागत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. तर दुसरीकडे दुर्गम भागातील विविध भागात पाणी आणण्यासाठी मदतनीस अर्धा किलोमीटरची पायपीट करत असल्याचे दिसून आले आहे.

धडगाव तालुक्यातील पाचशेच्या जवळपास अंगणवाड्या ह्या नळ कनेक्शन नसलेल्या आहेत. अंगणवाड्यांना ग्रामपंचायतीकडून कनेक्शन देणे अपेक्षित असतानाही कारवाई मात्र झालेली नाही.