शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:10 IST

जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने कापूस व हरभरा ओला

ठळक मुद्देअक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पाऊसग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळदिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.६ : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाले़ पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे़आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होते़ मंगळवारी सकाळी ९ नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणाºया अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी ३६ तास पावसाची स्थिती कायम राहणार आहे़शहादा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला. शहरात सकाळी अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पाठोपाठ तालुक्यातील सारंगखेडा, ब्राह्मणपुरी येथे पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी सर्वांचीच अडचण झाली. शहरात दुपारी १२ वा. सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला सुमारे तासभर पाऊस झाला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला़ सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना आज सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण होते़नंदुरबार शहर व तालुक्यातही सकाळपासून पाऊस झाला़ सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहरात नागरिकांची धावपळ उडाली होती़ मंगळवार असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्या महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पावसातच खरेदी न करताच परत गेले होते़ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़नवापूर शहर आणि तालुक्यात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली. ती दिवसभर कायम राहिली. दुपारी तीन नंतर पावसाचा जोर वाढला होता़ मधून मधून ढगांचा गरजण्याचा आवाजही झाला. शेतांमधे काढुन ठेवलेला भुईमूग व भाताचा चारा या पावसात भिजल्याने पशुपालक व शेतकºयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ