शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारमध्ये रब्बी पिकांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 13:10 IST

जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाल्याने कापूस व हरभरा ओला

ठळक मुद्देअक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पाऊसग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळदिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.६ : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाले़ पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे़आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होते़ मंगळवारी सकाळी ९ नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणाºया अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी ३६ तास पावसाची स्थिती कायम राहणार आहे़शहादा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला. शहरात सकाळी अवकाळी पावसाची सुरुवात झाली. पाठोपाठ तालुक्यातील सारंगखेडा, ब्राह्मणपुरी येथे पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकरी, व्यापारी सर्वांचीच अडचण झाली. शहरात दुपारी १२ वा. सुमारास पावसाने चांगलाच जोर धरला सुमारे तासभर पाऊस झाला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला़ सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना आज सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाची रिपरिप आणि ढगाळ वातावरण होते़नंदुरबार शहर व तालुक्यातही सकाळपासून पाऊस झाला़ सकाळी आठ वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नंदुरबार शहरात नागरिकांची धावपळ उडाली होती़ मंगळवार असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेत्या महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पावसातच खरेदी न करताच परत गेले होते़ यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे़नवापूर शहर आणि तालुक्यात पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली. ती दिवसभर कायम राहिली. दुपारी तीन नंतर पावसाचा जोर वाढला होता़ मधून मधून ढगांचा गरजण्याचा आवाजही झाला. शेतांमधे काढुन ठेवलेला भुईमूग व भाताचा चारा या पावसात भिजल्याने पशुपालक व शेतकºयांचे नुकसान झाले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ