शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

रेल्वे ट्रॅक धरुन बिहारमध्ये जाणारे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उधना-जळगाव असा रेल्वेट्रॅक धरुन बिहार राज्यातील आपल्या गावी पायी जाणाऱ्या २२ जणांना पोलीसांनी ताब्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव असा रेल्वेट्रॅक धरुन बिहार राज्यातील आपल्या गावी पायी जाणाऱ्या २२ जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांची रवानगी नंदुरबार शहरातील शेल्टर होमध्ये केली आहे़ हे २२ मजूर गुजरात राज्यातील पावगड येथून बिहारकडे जाण्यासाठी निघाले होते़लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने गुजरात राज्याच्या विविध भागात राहणारे परप्रांतीय मजूर गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहे़ यात बिहारी मजूरांनी नवीन शक्कल लढवत रात्रीच्यावेळी केवळ रेल्वेट्रॅकला धरुन प्रवास सुरु केला होता़ मजल दर मजल करत हे मजूर रविवारी रात्री रनाळे रेल्वेस्थानक परिसरात पोहोचले होते़ ही माहिती स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिली होती़ तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पोलीस पथकाला सोबत घेत रनाळे गाठून घेत पडताळणी केली असता, २२ जण दिसून आले़ हे सर्व २२ जण गुजरात राज्यातून निघाले होते़ रेल्वेट्रॅकमुळे कोणी विचारणा करणार नाही, अशी धारणा धरुन ते रात्रीच्यावेळी मार्गस्थ होत होते़ दर दिवशी किमान पाच किलोमीटर पायी चालून ते येथेवर आले असल्याची महिती आहे़ त्यांना तातडीने ताब्यात घेत प्रशासनाने शहरातील पालिका शाळा क्रमांक एकमध्ये तयार करण्यात आलेल्या शेल्टरहोमध्ये ठेवले आहे़ त्यांच्याकडून प्रशासनाने घरी जावू द्यावे अशी आर्जव सातत्याने करण्यात येत होती़विशेष बाब म्हणजे हे सर्व २२ लोक मजूरांच्या एका टोळीचे मुकादम असून त्यांच्या मागे गुजरात राज्यात आणखी किमान १५० जण असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़ दाखल करण्यात आलेल्या २२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे़ त्यांना सेवाभावी संस्थांच्या मदतीने जेवण देण्यात येणार आहे़

शाळा क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलेल्या मजूरांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाकडून त्यांचे येथेच काही काळसाठी पुनर्वसन करण्याचा विचार आहे़ यात त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार देऊन त्यांची व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरु आहे़ यासाठी मंगळवारपासून सुरु होणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात विचारणा करुन तशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार थोरात यांच्याकडून देण्यात आली आहे़