शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

मंदाणे गावात बाधितांची संख्या पोहोचली ४० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येऊनही नागरिक, तरुण वर्ग बिनधास्तपणे वावरत असल्याने दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे गावात कडक ...

प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येऊनही नागरिक, तरुण वर्ग बिनधास्तपणे वावरत असल्याने दिवसेंदिवस धोका वाढू लागला आहे. त्यामुळे गावात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरत आहे. मंदाणे गाव हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच गावाच्या चारही बाजूने जोडणारे रस्ते असल्याने गावात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच पुणे, मुंबई, नाशिकसारख्या भागातून व मध्य प्रदेशातून येणारे नागरिक गावात प्रवेश करीत असल्याने याची माहिती कोणालाही होत नाही. येणाऱ्या लोकांवर प्रशासनाने नजर ठेवून विनापरवानगी गावात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची सखोल चौकशी होऊन त्यांना क्वारंटाईन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग यांच्याकडून वेळोवेळी कडक सूचना देण्यात येऊनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक जागी थुंकणे, फिरणे, मास्क न लावणे, गुटखा खाणे, डिस्टन्स न पाळणे असे प्रकार सुरू असल्याने कोरोना महामारीचे संक्रमण वाढू लागले आहे. मंदाणे गावात आतापर्यंत बाधितांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तसेच नऊ ते दहाजणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ असलेले स्री-पुरुष दगावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

परिसरातील असलोद, कर्जोत, उजळोद, डोंगरगाव, ओझर्टे, कमरावद, सावखेडा या गावातही बाधितांची संख्या वाढत आहे. या आजाराचे संक्रमण होऊ नये म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, पोलीसपाटील सुभाष भिल, पं. स.च्या माजी सदस्या सुषमा साळुंके व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.