शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

करमाफीसाठी आता जि़प़च्या ठरावाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 12:52 IST

नंदुरबार : जिल्ह्याच्या चार तालुक्यात दुष्काळ असल्याने विविध सवलती जाहिर झाल्या आहेत़ सवलतींची अंमलबजावणी होत असली तरी  ग्रामपंचायतींच्या ‘कर’ही ...

नंदुरबार : जिल्ह्याच्या चार तालुक्यात दुष्काळ असल्याने विविध सवलती जाहिर झाल्या आहेत़ सवलतींची अंमलबजावणी होत असली तरी  ग्रामपंचायतींच्या ‘कर’ही माफ व्हावा अशी ग्रामीण नागरिकांची अपेक्षा आह़े जिल्हा परिषदेला  ठराव करुन पाणी आणि घरपट्टी माफ करणे शक्य असल्याने कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आह़े    तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या चार तालुक्यात यंदा दुष्काळ आह़े दिवसेंदिवस दुष्काळाचा दाह वाढत असल्याने ग्रामीण भागात चिंता वाढल्या आहेत़ पाणीटंचाईसह विविध अडचणींना तोंड देणा:या नागरिकांना सोयी सवलती देण्यात येत असल्या तरी त्या शेतीक्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत़  दुष्काळामुळे  गावगाडाच विस्कळीत झाल्याने शेतकरी आणि मजूर यांची अवस्था बिकट झाली आह़े  यातच ग्रामपंचायतींनी घर व पाणीपट्टीच्या नोटीसा पुढे केल्या आहेत़ हा कर भरणे यंदा शक्यच होणार नसल्याने जमिन महसूलाप्रमाणेच घरपट्टी आणि पाणीपट्टीचा कर माफ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े नंदुरबार  तालुक्यातील 154 गावे आणि 137 ग्रामपंचायती, शहादा 185 गावे आणि 150 ग्रामपंचायती, तळोदा 94 गावे आणि 67 तर नवापूर तालुक्यातील 163 गावे आणि 114 ग्रामपंचायतींकडून याबाबतचे ठराव करुन जिल्हा परिषदेकडे दिल्यास यावर तोडगा निघण्याची दाट शक्यता आह़े एकूण 468 ग्रामपंचायती आणि 596 गावांमध्ये होणा:या एकमुखी मागणीबाबत येत्या काळात ठराव होतो किंवा कसे याकडे सध्यातरी लक्ष लागून आह़े विशेष म्हणजे हा ठराव जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी करावयाचा असल्याने प्रशासनाने आधीच कर वसुलीच्या मुद्दय़ावर सावध पवित्रा घेतला आह़े 31 मार्च 2018 र्पयत जिल्हा परिषदेने 8 कोटी 87 लाख रूपयांच्या घरपट्टची वसुली केली होती़ तर 4़97 कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली होती़ या वसुलीनंतर येत्या 31 मार्चर्पयतच्या वसुलीची तयारी ग्रामपंचायतींकडून सुरु झाली आह़े ग्रामपंचायतीकडून जागेच्या प्रती 1 हजार रुपये भांडवली मूल्यानुसार कराची आकारणी करण्यात येत़े यात झोपडी आणि मातीच्या इमारतीसाठी 30 ते 75 पैसे, दगड किंवा विटांद्वारे तयार केलेल्या मातीच्या इमारतीतून 60 ते 120 पैसे दगड, विटा, चुना आणि सिमेंट यातून बांधलेल्या पक्क्या इमारतीपासून 75 पैसे 1 रुपया 50 पैसे, आरसीसी बांधकामासाठी 1 रुपया 20 पैसे ते 2 रुपये या दराने कर आकारणी निश्चित केली जात़े वार्षिक पद्धतीने आकारणी होणा:या या करात दर चार वर्षानी सुधारणा करण्याची तरतूद आह़े वार्षिक मूल्यदर आणि बांधकामाचे दर यानुसार ही सुधारणा केली जात़े जिल्ह्यातील 952 गावांच्या 586 ग्रामपंचायतींमध्ये या सुधारणांबाबत उदासिनता असल्याने घर 60 वर्षापेक्षा अधिक काळाचे होऊनही नवीन घरासाठी लागणारा 100 टक्के कर भरावा लागत असल्याचे प्रकार होत आहेत़  यामुळे काहींकडे थकबाकीची स्थिती निर्माण झाली आह़ेजिल्हा परिषदेने धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातही दुष्काळ घोषित करण्याचा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत करुन घेतला आह़े यामुळे कर माफ करण्याचा ठरावही करणे शक्य असल्याचे बोलले जात आह़े यापूर्वी मराठवाडय़ात करमाफीचे ठराव जिल्हा परिषदांनी केल्याची माहिती आह़े शासनाने जमीन महसूलात दिलेल्या माफीच्या सवलतीमुळे जिल्हा परिषदेला जमीन महसूलावर मिळणारे 60 ते 65 लाख रुपयांर्पयतचे अनुदानही माफच झाले आह़े या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेने करांच्या रकमेबाबत ठराव करुन निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिकांची आह़े  करांबाबत उद्भवलेल्या या समस्येत सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दर चार वर्षानी कर सुधारणा समित्यांकडून करण्यात येणा:या सुधारणा किंवा कर वाढ ही चार वर्षापूर्वीच्या रकमेच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक नसावे असे म्हटले आह़े परंतू अनेक ठिकाणी तशी कारवाई झालेली नसल्याचे ग्रामपंचायतींच्या दप्तरी नोंद झाली आह़े