शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बदलीप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

तळोदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी एस.बी. खर्डे यांनी काही महिन्यापूर्वी तळोदा तालुक्यातील पाच ग्राम सेवकांच्या बदल्या तालुक्या अंतर्गत ...

तळोदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी एस.बी. खर्डे यांनी काही महिन्यापूर्वी तळोदा तालुक्यातील पाच ग्राम सेवकांच्या बदल्या तालुक्या अंतर्गत केल्या होत्या. या प्रकरणी काही पदाधिकाऱ्यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या होत्या. सदर तक्रारींची दखल घेत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकांच्या बदल्या संदर्भात तत्काळ लेखी अहवाल सादर करण्याची सूचना गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यांनी लेखी अहवालही पाठवला होता. या अहवालाचे अवलोकन जिल्हा परिषदचे सीईओ यांनी केले असता तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रे सादर न करता ग्रामसेवकांच्या सर्वसाधारण बदल्यांची माहिती कार्यालयास पाठविण्यास आली आहे. साहजिकच कार्यालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सर्वसाधारण बदल्यानंतर किती ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा अहवाल मागविण्यात आला होता. परंतु सर्वसाधारण बदल्यांचीच माहिती इकडील कार्यालयास पाठवण्यात आली आहे. प्रत्यक्षात अहवालाचा पुन्हा अभ्यास केला असता या पाचही ग्रामसेवकांची बदली आपण नियमबाह्यपणे केल्याचे निदर्शनास येते. वास्तविक आपणास बदल्या करण्याचा अधिकार नसताना किंबहुना आपल्या गट स्तरावरील ग्रामसेवकांबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या नंतर यांची सखोल चौकशी करून जर ते दोषी आढळून आले तर त्यांची इतर ठिकाणी बदली करणेकामी वस्तूनिष्ठ एकत्रित अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविणे क्रमप्राप्त होते. तदनंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करायचा असतो. मात्र आपल्या गट स्तरावर बदल्या करण्याचा अधिकार आपणास नसताना चुकीच्या पद्धतीने आपण बदल्या केल्याचे निदर्शनास येते. ही बाब निश्चितच गंभीर स्वरूपाची व कर्तव्यात कसूर करणारी आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ चे कलम तीनचा भंग केला आहे. म्हणून आपणाविरोधात शिस्तभंगविषयक प्रस्ताव शासनास का सादर करण्यात येऊ नये, असे नोटिसीत नमूद करून तीन दिवसांच्या आत विहीत मुदतीत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेशीत करून आपला खुलासा प्राप्त न झाल्यास तुमचे काही एक म्हणणे नाही असे समजून शिस्तभंगविषयक कार्यवाहीचा प्रस्ताव पुढील कारवाईकरिता शासनास सादर करण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये दिला आहे. आता जिल्हा परिषदेच्या पुढील कारवाईकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.