शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:49 IST

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. ...

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, साबीर शेख, आमदार के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,  फडणवीस सरकारने शेतकरी, उद्योजक, मजूर यांची फसवणूक चालविली आहे. एकाही आघाडीवर सरकारला यश आलेले नाही. कजर्माफीत शेतक-यांची फसवणूक चालविली आहे. सहा महिने झाले अद्याप एक रुपयाही शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे या सरकारवरील लोकांचा विश्वास कधीचाच उडाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यांमध्ये मिसळून सरकारच्या अपयश जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.

गुजरात निवडणुकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले,  राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा धसका घेतला की सलग 50 दिवस पंतप्रधानांना गुजरातमध्ये थांबावे लागत आहे. गुजरात विकासाचे मॉडेल होते तर मग पंतप्रधानांना ही वेळ का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मोदी सरकार आणि फडणवीस सरकारावर टीका केली. प्रस्ताविक व सूत्रसंचलन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरीफ कमर शेख व समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार दिलावरशा कादरशा यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा चंद्रकांत रघुवंशी यांना पाठींबा जाहीर केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण