शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस नव्हे, फसवणूक सरकार : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:49 IST

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. ...

नंदुरबार : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी वा-यावर आहेत. कजर्माफीच्या घोषणेला सहा महिने झाले, परंतु एक रुपया मिळाला नाही. फडणवीस सरकार नाही तर फसवणूक सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबारातील सभेत बोलतांना केले. पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ खासदार अशोक चव्हाण यांची नंदुरबारातील इलाही चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री अब्दुल सत्तार, साबीर शेख, आमदार के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा रघुवंशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,  फडणवीस सरकारने शेतकरी, उद्योजक, मजूर यांची फसवणूक चालविली आहे. एकाही आघाडीवर सरकारला यश आलेले नाही. कजर्माफीत शेतक-यांची फसवणूक चालविली आहे. सहा महिने झाले अद्याप एक रुपयाही शेतक-यांना मिळाला नाही. त्यामुळे या सरकारवरील लोकांचा विश्वास कधीचाच उडाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता जनसामान्यांमध्ये मिसळून सरकारच्या अपयश जनतेसमोर आणावे, असे आवाहन केले.

गुजरात निवडणुकीबाबत बोलतांना त्यांनी सांगितले,  राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढा धसका घेतला की सलग 50 दिवस पंतप्रधानांना गुजरातमध्ये थांबावे लागत आहे. गुजरात विकासाचे मॉडेल होते तर मग पंतप्रधानांना ही वेळ का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मोदी सरकार आणि फडणवीस सरकारावर टीका केली. प्रस्ताविक व सूत्रसंचलन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अरीफ कमर शेख व समाजवादी पार्टीचे अपक्ष उमेदवार दिलावरशा कादरशा यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार र}ा चंद्रकांत रघुवंशी यांना पाठींबा जाहीर केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण