शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

महिलांच्या सुरक्षेसोबत सक्षमीकरणासाठी नयना देवरे यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नयना यांनी यापूर्वी जळगाव, बुलडाणा, मुंबई येथे देखील चांगल्या कामाने आपला ठसा उमटविला आहे. वस्तुत: पोलीस दलात आल्यावर आपल्याला ...

नयना यांनी यापूर्वी जळगाव, बुलडाणा, मुंबई येथे देखील चांगल्या कामाने आपला ठसा उमटविला आहे. वस्तुत: पोलीस दलात आल्यावर आपल्याला चांगले वातावरण उपलब्ध होईल का, महिला म्हणून समस्या येतील का अशा शंका त्यांच्या मनात होत्या. मात्र मुंबई येथे एका क्लिष्ट प्रकरणात चांगली कामगिरी बजावल्याने वरिष्ठांकडून

झालेल्या कौतुकाने मनातील शंकेची जागा आत्मविश्वासाने घेतली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आपली जबाबदारी उत्तमरितीने सांभाळून त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. गेली दोन वर्षे त्या महिला कक्षात काम करीत आहेत. चांगल्या कामगिरीसाठी जळगाव आणि नंदुरबार पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या पाठीवर अभिनंदन पत्राद्वारे कौतुकाची थापही दिली आहे. सकाळी दहाला कार्यालयात आल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या समस्या सोडविण्याचे त्यांचे काम सुरू होते. काही वेळा सासरच्या मंडळींना समजावून महिलेच्या संसाराची घडी नीट करण्याचा प्रयत्न होते, तर काही वेळा महिलेला शारीरिक त्रास देण्यात आला असल्यास तिला कायदेशीर प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्षात येणाऱ्या तक्रारींची दखलही तात्काळ घेतली जाते.

दोन पिढींमधील वैचारिक अंतरामुळे काहीवेळा मुली घर सोडून जातात. अशा मुलींना शोधून घरच्यांच्या स्वाधीन करण्याचे कामही त्यांनी केले आहे. नंदुरबारमध्ये आर्थिक परिस्थिती आणि शिक्षण नसल्याने पालकांना बऱ्याचदा मुलांनी रोजगाराकडे लक्ष द्यावे असे वाटते, तर मुलींना शिक्षण हवे असते. अशावेळी पालकांना शिक्षणाचे महत्व सांगून आणि मुलींना पालकांना मदत करण्याबाबत समजावून कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात. भावनेच्या भरात अल्पवयीन मुलींना कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून त्या प्रयत्नशील असतात. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात जुनागढला निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरी आणण्याचे वेगळे समाधान मिळाल्याचे त्या सांगतात. कौटुंबिक हिंसाचारामुळे असहायतेची भावना महिलांच्या मनात निर्माण होते. त्यांना आधार देण्याचे कार्य नयना देवरे यांनी केले आहे. त्यांनी तीन महिलांना गृहउद्योगासाठी प्रोत्साहीत केले. आज या महिला स्वावलंबन आणि सन्मानाच्या जीवनाकडे वाटचाल करीत आहेत. पोलीस विभागात काम करतांना त्यांनी आपल्यातल्या संवेदनशील महिलेचे दर्शनही कार्यातून घडविले आहे. लॉकडाऊन काळात परिसरात धुणेभांडी करणाऱ्या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने घरात येणारे उत्पन्न पूर्णत: बंद झाले. अशावेळी त्यांनी सासरच्या मंडळीच्या मदतीने त्या महिलेला धान्य पुरविले. दररोज समस्या आणि तपासाच्या वातारणात असे क्षण समाधान देणारे असल्याचे त्या म्हणतात. नंदुरबारला रूजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साधारण 150 संसार जोडण्याचे काम केले आहे. नयना यांचे पतीदेखील पोलीस दलात आहे. दोघांची भूमीका एकमेकांना सहाय्यक अशीच आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या दोन मुलांपैकी 2 वर्षाचा मुलगा सासू-सासऱ्यांकडे राहतो. लहान मुले पाहिल्यावर मुलाची आठवण येऊन वाईट वाटत असले तरी बिघडलेले संसार जोडून मिळणाऱ्या आनंदात आईचे अश्रू विसरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कर्तव्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दुय्यम स्थान देऊन ह्यसदरक्षणाय खलनिग्रहणायह्ण ही भूमीका सक्षमपणे अदा करण्याचे प्रशिक्षण पोलीस दलात दिले जाते. त्याच मार्गावर नयना दमदारपणे वाटचाल करीत आहेत.

नयना देवरे-कुटुंबीयांची चांगली साथ मिळाली आहे. पीडित महिलांनी कुणाचा आधार घेवून जगण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना गृहउद्योग करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असतो. एखादे कुटुंब पुन्हा एकत्र आले की मिळणारा आनंद दिवसाचा थकवा घालविणारा असतो.