शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

महिलांच्या सुरक्षेसोबत सक्षमीकरणासाठी नयना देवरे यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नयना यांनी यापूर्वी जळगाव, बुलडाणा, मुंबई येथे देखील चांगल्या कामाने आपला ठसा उमटविला आहे. वस्तुत: पोलीस दलात आल्यावर आपल्याला ...

नयना यांनी यापूर्वी जळगाव, बुलडाणा, मुंबई येथे देखील चांगल्या कामाने आपला ठसा उमटविला आहे. वस्तुत: पोलीस दलात आल्यावर आपल्याला चांगले वातावरण उपलब्ध होईल का, महिला म्हणून समस्या येतील का अशा शंका त्यांच्या मनात होत्या. मात्र मुंबई येथे एका क्लिष्ट प्रकरणात चांगली कामगिरी बजावल्याने वरिष्ठांकडून

झालेल्या कौतुकाने मनातील शंकेची जागा आत्मविश्वासाने घेतली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आपली जबाबदारी उत्तमरितीने सांभाळून त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. गेली दोन वर्षे त्या महिला कक्षात काम करीत आहेत. चांगल्या कामगिरीसाठी जळगाव आणि नंदुरबार पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या पाठीवर अभिनंदन पत्राद्वारे कौतुकाची थापही दिली आहे. सकाळी दहाला कार्यालयात आल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या समस्या सोडविण्याचे त्यांचे काम सुरू होते. काही वेळा सासरच्या मंडळींना समजावून महिलेच्या संसाराची घडी नीट करण्याचा प्रयत्न होते, तर काही वेळा महिलेला शारीरिक त्रास देण्यात आला असल्यास तिला कायदेशीर प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात येते. दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्षात येणाऱ्या तक्रारींची दखलही तात्काळ घेतली जाते.

दोन पिढींमधील वैचारिक अंतरामुळे काहीवेळा मुली घर सोडून जातात. अशा मुलींना शोधून घरच्यांच्या स्वाधीन करण्याचे कामही त्यांनी केले आहे. नंदुरबारमध्ये आर्थिक परिस्थिती आणि शिक्षण नसल्याने पालकांना बऱ्याचदा मुलांनी रोजगाराकडे लक्ष द्यावे असे वाटते, तर मुलींना शिक्षण हवे असते. अशावेळी पालकांना शिक्षणाचे महत्व सांगून आणि मुलींना पालकांना मदत करण्याबाबत समजावून कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात. भावनेच्या भरात अल्पवयीन मुलींना कोणत्याही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून त्या प्रयत्नशील असतात. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात जुनागढला निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरी आणण्याचे वेगळे समाधान मिळाल्याचे त्या सांगतात. कौटुंबिक हिंसाचारामुळे असहायतेची भावना महिलांच्या मनात निर्माण होते. त्यांना आधार देण्याचे कार्य नयना देवरे यांनी केले आहे. त्यांनी तीन महिलांना गृहउद्योगासाठी प्रोत्साहीत केले. आज या महिला स्वावलंबन आणि सन्मानाच्या जीवनाकडे वाटचाल करीत आहेत. पोलीस विभागात काम करतांना त्यांनी आपल्यातल्या संवेदनशील महिलेचे दर्शनही कार्यातून घडविले आहे. लॉकडाऊन काळात परिसरात धुणेभांडी करणाऱ्या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने घरात येणारे उत्पन्न पूर्णत: बंद झाले. अशावेळी त्यांनी सासरच्या मंडळीच्या मदतीने त्या महिलेला धान्य पुरविले. दररोज समस्या आणि तपासाच्या वातारणात असे क्षण समाधान देणारे असल्याचे त्या म्हणतात. नंदुरबारला रूजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साधारण 150 संसार जोडण्याचे काम केले आहे. नयना यांचे पतीदेखील पोलीस दलात आहे. दोघांची भूमीका एकमेकांना सहाय्यक अशीच आहे. लॉकडाऊन काळात त्यांच्या दोन मुलांपैकी 2 वर्षाचा मुलगा सासू-सासऱ्यांकडे राहतो. लहान मुले पाहिल्यावर मुलाची आठवण येऊन वाईट वाटत असले तरी बिघडलेले संसार जोडून मिळणाऱ्या आनंदात आईचे अश्रू विसरण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कर्तव्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला दुय्यम स्थान देऊन ह्यसदरक्षणाय खलनिग्रहणायह्ण ही भूमीका सक्षमपणे अदा करण्याचे प्रशिक्षण पोलीस दलात दिले जाते. त्याच मार्गावर नयना दमदारपणे वाटचाल करीत आहेत.

नयना देवरे-कुटुंबीयांची चांगली साथ मिळाली आहे. पीडित महिलांनी कुणाचा आधार घेवून जगण्यापेक्षा स्वावलंबी व्हावे यासाठी त्यांना गृहउद्योग करण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असतो. एखादे कुटुंब पुन्हा एकत्र आले की मिळणारा आनंद दिवसाचा थकवा घालविणारा असतो.