शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेला नेता हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट ...

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवतो, ही बाब महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आदर्श निर्माण करणारी होती, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केली.

अभ्यासू नेते...

खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनामुळे मन दु:खी झाले. ते माझ्यासाठी लहान भावासारखे होते. काँग्रेस पक्षाचे एक अतिशय तरुण, सक्रिय, अभ्यासू नेते होते. युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी पक्षात आणि आयुष्यात सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे समर्थन केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही एक महान नेता गमावला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आता खासदार सातव यांच्यासारखे उमदे नेतृत्व आपल्यातून गेले.

-ॲड. के. सी. पाडवी,

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री.

सर्वसामान्यांचा नेता

एक ग्राऊंड लेव्हलचा नेता महाराष्ट्राने गमावला. तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. दिल्लीला गेलेला व हायकमांडशी जवळीक असलेल्या नेत्याचा स्वभाव बदलतो. परंतु खासदार सातव नेहमीच सर्वसामान्य नेते राहिले. त्यांच्या आई रजनी सातव व आपण एकाच वेळी विधान परिषदेत आमदार होतो. दिल्लीला कधीही गेलो तर ते हक्काने भेटत असत.

-चंद्रकांत रघुवंशी,

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान शिवसेना नेते.

पक्षात मोठी पोकळी

खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचे, मार्गदर्शन करायचे. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक साहेबांचीदेखील विचारपूस करायचे, असे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे.

-शिरीषकुमार नाईक, आमदार, नवापूर.

उच्च प्रतिभेचा नेता

खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. मी आमदार व मंत्री असताना त्यांचे व माझे मित्रत्त्वाचे संबंध होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील ते एक उच्च प्रतिभा असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मोठ्या नेत्याला मुकावे लागले आहे. महाराष्ट्र नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

-ॲड. पद्माकर वळवी,

माजी मंत्री.