शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवलेला नेता हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट ...

नंदुरबार : काँग्रेस नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवतो, ही बाब महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आदर्श निर्माण करणारी होती, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केली.

अभ्यासू नेते...

खासदार राजीव सातव यांच्या आकस्मिक निधनामुळे मन दु:खी झाले. ते माझ्यासाठी लहान भावासारखे होते. काँग्रेस पक्षाचे एक अतिशय तरुण, सक्रिय, अभ्यासू नेते होते. युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी पक्षात आणि आयुष्यात सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे समर्थन केले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही एक महान नेता गमावला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नेते अहमद पटेल यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. आता खासदार सातव यांच्यासारखे उमदे नेतृत्व आपल्यातून गेले.

-ॲड. के. सी. पाडवी,

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री.

सर्वसामान्यांचा नेता

एक ग्राऊंड लेव्हलचा नेता महाराष्ट्राने गमावला. तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असलेला नेता म्हणून खासदार राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते. दिल्लीला गेलेला व हायकमांडशी जवळीक असलेल्या नेत्याचा स्वभाव बदलतो. परंतु खासदार सातव नेहमीच सर्वसामान्य नेते राहिले. त्यांच्या आई रजनी सातव व आपण एकाच वेळी विधान परिषदेत आमदार होतो. दिल्लीला कधीही गेलो तर ते हक्काने भेटत असत.

-चंद्रकांत रघुवंशी,

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान शिवसेना नेते.

पक्षात मोठी पोकळी

खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बोलायचे, मार्गदर्शन करायचे. ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक साहेबांचीदेखील विचारपूस करायचे, असे अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व हरपल्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून न निघणारे आहे.

-शिरीषकुमार नाईक, आमदार, नवापूर.

उच्च प्रतिभेचा नेता

खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी दु:खदायक आहे. मी आमदार व मंत्री असताना त्यांचे व माझे मित्रत्त्वाचे संबंध होते. सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील ते एक उच्च प्रतिभा असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला मोठ्या नेत्याला मुकावे लागले आहे. महाराष्ट्र नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.

-ॲड. पद्माकर वळवी,

माजी मंत्री.