शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

राष्ट्रीयकृतसह खाजगी आणि सहकारी बँकांनी दिले १० हजार शेतकऱ्यांना पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १५ राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची पीक कर्ज वाटपाची गाडी अद्यापही अडखळत सुरू आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १५ राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांची पीक कर्ज वाटपाची गाडी अद्यापही अडखळत सुरू आहे़ जुलै मध्य येऊनही बँकांनी केवळ १९ टक्केच पीक कर्ज वाटप केले असून शेतकरी सातत्याने पीक कर्जाची मागणी करूनही अनेकांना कर्ज मिळालेले नाही़बुधवारी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत १४ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ९९ कोटी रूपयांचा निधी वर्ग केला आहे़ यामुळे सर्व १४ हजार शेतकºयांची नवीन पीक कर्ज घेण्याची वाट मोकळी झाली आहे़ यात सर्वाधिक १० हजार शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर उर्वरित ३ हजार ८०० शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत़ या शेतकºयांना नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र जिल्हा बँक वगळता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपात पूर्णपणे ढेपाळल्या असल्याचे चित्र आहे़ खरीप पेरण्या सुरू होवून पूर्ण होण्यावर येत असतानाही आजअखेरीस केवळ १० हजार शेतकºयांना पीक कर्ज देण्यात सर्व १५ खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांना यश आले आहे़ सर्व बँकांनी मिळून १४३ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केल्याची माहिती आहे़ यात एकट्या जिल्हा बँकेचा वाटा हा ४५ टक्के आहे़दरम्यान राष्ट्रीयकृत बँकांकडून नवीन पीक कर्जासाठी लागणाºया नो-ड्यूज प्रमाणपत्रासाठी शेतकºयांची फिरवाफिरव सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत़ सर्व कागदपत्रे देऊनही बँका लक्ष देत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ५ हजार १०८ शेतकरी आणि २२७ विकासो संस्था यांना ४४ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे़ यामुळे ७ हजार ३६३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे़ बँकांच्या १० हजार ११८ शेतकºयांचे ६५ कोटी रूपयांचे कर्ज माफ झाले आहे़ यातून या शेतकºयांना पुन्हा नव्याने कर्ज मिळणार असल्याने कर्जाचा आकडा वाढणार आहे़राष्ट्रीयकृत बँकांकडे नव्याने कर्ज मागणाºया शेतकºयांना ३० वर्षांचे खातेउतारे आणि सर्व बँकांमधून नोड्यूज प्रमाणपत्र आणण्याची सक्ती होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़आठ राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ४ हजार ८२६ शेतकºयांना ७९ कोटी ३७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे़ यात बँक आॅफ बडोदाने १ हजार ८७, बँक आॅफ इंडिया ३०९, बँक आॅफ महाराष्ट्र ८०२, कॅनरा बँक ४४, सेंट्रल बँक आॅफ इंडिया १ हजार ३८३, पंजाब नॅशनल बँक ४२, युनियन बँक ५६७ तर स्टेट बँक आॅफ इंडियाने ५९२ शेतकºयांना कर्ज दिले आहे़४जिल्ह्यातील चार खाजगी बँकांनी ५५१ शेतकºयांना १७ कोटी २२ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकेने २२४ शेतकºयांना २ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटप केले आहे़